शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

रोजगार बंद, आता शिवभोजन केंद्रावर भरणार पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आता १ मेपर्यंत कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या काळात व्यापार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आता १ मेपर्यंत कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या काळात व्यापार बंद असेल. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे रोजी तर गेली पण पोट भरायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच राज्य सरकारने शिवभोजन केंद्रांवर मोफत थाळीची घोषणा केल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र आहेत. त्यातून ३,५०० थाळींचे वाटप केले जाते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यात कडक निर्बंध आणि संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांचा रोजगार बुडणार आहे. यामुळे त्यांची रोजी तर गेली पण रोटीचा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारने या काळात शिव भोजन केंद्रांमधून मोफत थाळी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज किमान ३,५०० लोकांच्या भुकेचा प्रश्न तरी मिटू शकतो. जिल्ह्यात जळगाव शहरासह सर्वच प्रमुख ठिकाणी ३८ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रांतून दररोज फक्त पाच रुपयात अनेकांची भूक भागते. जळगाव शहरातही जिल्हाधिकारी कार्यालय, चित्रा चौक परिसरात शिवभोजन केंद्र आहे. मात्र, बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी आहे.

३५०० लोकांची भागणार भूक

जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर ३,५०० जणांची भूक भागणार आहे. सरकारने ही योजना लागू करताना एका थाळीची किंमत १० रुपये ठेवली होती. त्यानंतर त्याच थाळीची किंमत सरकारने ५ रुपये केली. जानेवारी २०२१पासून या थाळीची किंमत पुन्हा १० रुपये करण्यात आली होती. मात्र, ३० मार्चपासून ही थाळी पाच रुपयातच दिली जात आहे.

थाळीचा लाभ घेणारे -

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही नियमितपणे शिवभोजन थाळीचा लाभ घेतो. मात्र, आता शासनाने संचारबंदी केली आहे. त्यामुळे उद्यापासून घराबाहेर पडायचे तरी कसे, असा प्रश्न आहे. घराबाहेरच पडायचे नाही तर रोजगार गेला. ही मोफत थाळी खायला यायचे तरी कसे?

- अनिल जोहरे

संचारबंदीत बाहेर जेवणासाठी निघालो आणि त्याचवेळी पोलिसांनी अडवले तर काय करायचे. आधीच रोजगार गेला आहे. आता खायच्याही अडचणी होतील. - अनिल सोनवणे

गेल्या महिनाभरापासून रोजगार नाही. आता संचारबंदीने आणखी अडचण येईल. सरकारने मोफत जेवण दिले, पण ते घ्यायला जाताना पोलिसांनी अडवले तर काय करायचे.

- अजय धनगर

जिल्ह्यात असलेली शिवभोजन केंद्र

३८

केले जाणारे थाळीवाटप

३५००