शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रोजगार बंद, आता शिवभोजन केंद्रावर भरणार पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आता १ मेपर्यंत कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या काळात व्यापार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आता १ मेपर्यंत कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. या काळात व्यापार बंद असेल. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे रोजी तर गेली पण पोट भरायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच राज्य सरकारने शिवभोजन केंद्रांवर मोफत थाळीची घोषणा केल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्र आहेत. त्यातून ३,५०० थाळींचे वाटप केले जाते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज्यात कडक निर्बंध आणि संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांचा रोजगार बुडणार आहे. यामुळे त्यांची रोजी तर गेली पण रोटीचा प्रश्न कायम आहे. राज्य सरकारने या काळात शिव भोजन केंद्रांमधून मोफत थाळी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज किमान ३,५०० लोकांच्या भुकेचा प्रश्न तरी मिटू शकतो. जिल्ह्यात जळगाव शहरासह सर्वच प्रमुख ठिकाणी ३८ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रांतून दररोज फक्त पाच रुपयात अनेकांची भूक भागते. जळगाव शहरातही जिल्हाधिकारी कार्यालय, चित्रा चौक परिसरात शिवभोजन केंद्र आहे. मात्र, बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी आहे.

३५०० लोकांची भागणार भूक

जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर ३,५०० जणांची भूक भागणार आहे. सरकारने ही योजना लागू करताना एका थाळीची किंमत १० रुपये ठेवली होती. त्यानंतर त्याच थाळीची किंमत सरकारने ५ रुपये केली. जानेवारी २०२१पासून या थाळीची किंमत पुन्हा १० रुपये करण्यात आली होती. मात्र, ३० मार्चपासून ही थाळी पाच रुपयातच दिली जात आहे.

थाळीचा लाभ घेणारे -

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही नियमितपणे शिवभोजन थाळीचा लाभ घेतो. मात्र, आता शासनाने संचारबंदी केली आहे. त्यामुळे उद्यापासून घराबाहेर पडायचे तरी कसे, असा प्रश्न आहे. घराबाहेरच पडायचे नाही तर रोजगार गेला. ही मोफत थाळी खायला यायचे तरी कसे?

- अनिल जोहरे

संचारबंदीत बाहेर जेवणासाठी निघालो आणि त्याचवेळी पोलिसांनी अडवले तर काय करायचे. आधीच रोजगार गेला आहे. आता खायच्याही अडचणी होतील. - अनिल सोनवणे

गेल्या महिनाभरापासून रोजगार नाही. आता संचारबंदीने आणखी अडचण येईल. सरकारने मोफत जेवण दिले, पण ते घ्यायला जाताना पोलिसांनी अडवले तर काय करायचे.

- अजय धनगर

जिल्ह्यात असलेली शिवभोजन केंद्र

३८

केले जाणारे थाळीवाटप

३५००