शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शाळासिध्दी उपक्रमात जळगाव राज्यात अकराव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 21:59 IST

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात ‘शाळासिध्दी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात अकरावे स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १ हजार १९० शाळांना ‘अ’ श्रेणी जामनेर आघाडीवरबाह्यमूल्यांकन रखडले

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.१०-प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘शाळासिध्दी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातंर्गत शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमूल्याकनानुसार जळगाव जिल्ह्यातील १ हजार १९० शाळांनी या ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या आधारावर राज्यात ‘शाळासिध्दी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने राज्यात अकरावे स्थान पटकाविले आहे.

जानेवारी २०१७ पासून हा उपक्रम सुरु असून, त्याव्दारे पहिल्या मूल्यांकनात शाळांनी स्वयंमूल्याकन करून घ्यावयाचे होते. जिल्ह्यातील ३ हजार ३२४ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्या पैकी ३ हजार २२६ शाळांनी आपले स्वयंमूल्यांकन करून घेतले. तर ९८ शाळांनी अद्याप स्वयंमूल्याकन करून घेतले नाही. या स्वयंमूल्याकनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळांकडून स्वयंमूल्यांकन करण्यात आले. शाळांनी केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावर राज्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. तर अहमदनगर दुसºया स्थानावर आहे.

इन्फो-श्रेणी - शाळांची संख्याअ - १ हजार १९०ब - २ हजार ३३क -  ८९

तालुकानिहाय अ श्रेणीतील शाळाअमळनेर - १२६ , भडगाव - २९, भुसावळ- ६१, बोदवड-२४, चाळीसगाव-१०७, चोपडा-५८, धरणगाव-५३, एरंडोल-६१, जळगाव- ६२, जळगाव मनपा - ६५, जामनेर - १२७, मुक्ताईनगर - ६८, पाचोरा-८०, पारोळा-६६, रावेर-९५, यावल- १०८

बोदवड पिछाडीवर तर जामनेरची आघाडीशाळांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनाच्या आधारावर सर्वाधिक अ श्रेणी प्राप्त केलेल्या सर्वाधिक १२७ शाळा जामनेर तालुक्यातील आहे. तर सर्वात कमी २४ शाळा या बोदवड तालुक्यातील आहे.

बाह्यमूल्यांकन रखडलेदरम्यान, शाळांनी स्वयंमूल्यांकन करून शााळांना श्रेणी वाटून दिल्या आहेत. केंद्रिय विकास मंत्रालयाच्या ‘न्यूपा’ (राष्टÑीय शैक्षणि नियोजन व प्रशासन विद्यापीठ,दिल्ली) कडून हा उपक्रम राबविला जात असून, स्वयंमूल्यांकन झालेल्या शाळांचे आता बाह्यमूल्यांकन करण्यात येणार आहे. शाळांनी स्वयंमूल्यांकन केल्यानंतर महिनाभरात हे मूल्यांकन होणे अपेक्षित होते. मात्र दोन ते तीन महिने होवून देखील जिल्ह्यातील शाळांचे बाह्यमूल्यांकन झालेले नाही.