शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 20:43 IST

स्थापनेनंतर प्रथमच होणाऱ्या मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार दि.२० जुलै रोजी जाहीर होणार असून नगराध्यक्षपदासह ७३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगरातील या पहिल्या वहिल्या निवडणुकीने जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देमतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्णनेत्यांची प्रतिष्ठा लागली पणालाअवघ्या पंधरा मिनिटात येणार पहिला निकाल

लोकमत आॅनलाईनमुक्ताईनगर, दि.१९ : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि.२० रोजी शुक्रवारी होत असून यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून ७३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, पहिल्या पंधरा मिनिटातच वॉर्ड क्रमांक १, २, आणि ३ चे निकाल जाहीर होण्याची शक्यता असून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे.स्थापनेनंतर प्रथमच मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना व राष्ट्रवादी मिळून तिरंगी लढत झाली. अपक्षांनी देखील विविध प्रभागातून आपले प्राबल्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षातर्फे माधुरी आत्माराम जाधव, भाजपातर्फे नजमा इरफान तडवी आणि शिवसेना -राष्ट्रवादी आघाडीच्या ज्योत्स्ना तायडे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. एकूण १७ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.१५ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी होत असून निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.प्रशासनाची तयारी पूर्णमुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे . तहसिल कार्यालयातील सभागृहामध्ये ही मतमोजणी होेणार आहे . त्यासाठी सहा टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर ५ मशीन याप्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे. एका टेबलवर दोन कर्मचारी ज्यात एक सहाय्यक मतमोजणी अधिकारी व एक पर्यवेक्षक याप्रमाणे ६ टेबल वर १२ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महसूल व पोलिस प्रशासनाचे एकूण तिनशे कर्मचारी मतमोजणी दरम्यान संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिली . मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात येणार आहे.नेत्यांची प्रतिष्ठा पणालामुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक केवळ तालुका जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय बनलेली आहे. कारण मुक्ताईनगर मतदारसंघ राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाने ओळखला जात असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो ? याकडे संपूर्ण राज्याचे व विशेषत: खडसे समर्थक व विरोधक या दोन्ही गटातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय तंत्रशुद्ध असा प्रचार निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आला. केवळ तालुक्यातील पदाधिकारीच नव्हे तर भुसावळ, बोदवड सावदा, रावेर व मलकापूर या तालुक्यातून विविध जाती धर्माचे भाजपा कार्यकर्ते , नगरसेवक, नेते व आमदार यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले होते.तसेच मतदानाच्या दिवशी प्रत्येक प्रभागात किमान दोन बाहेरील नगरसेवकांची नियुक्ती करून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत चुरस वाढवलेली होती. त्यामुळे ही निवडणूक एकनाथराव खडसे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची मानली जात आहे. खडसे यांनी मुक्ताईनगर शहराचा प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष हा भाजपाचाच असेल तसेच १७ पैकी १७ जागांवर भाजपा विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.दरम्यान, शिवसेनेतर्फे जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी एक हाती किल्ला लढवला आहे. मुक्ताईनगरच्या प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची असलेली फळी, मजबूत संघटन व मतदान काढण्याची खुबी यामुळे शिवसेनेने या निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे . शिवसेनेने १२ जागांवर प्रभागातून उमेदवार दिलेले होते तर दोन प्रभागातून अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले होते. तसेच सेनेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी असल्याने तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या होत्या . शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी या निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरते हे आज स्पष्ट होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.काँग्रेस पक्षाने निर्माण केली चुरसकधी नव्हे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत नगराध्यक्षांसह सात प्रभागातून उमेदवार दिल्याने निवडणुकीत दुरंगी ऐवजी तिरंगी लढत मुक्ताईनगरवासियांना अनुभवायला मिळाली. तिरंगी लढत असल्यामुळे मते विभागली जाणे हे सहाजिकच आहे. मात्र काँग्रेस पक्षाला मिळालेली मते कोणाची? यावर सर्वच राजकीय पक्षांचे म्हणजे भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. हे मात्र नक्की.कधी नव्हे ते काँग्रेस पक्षाने या वेळी अतिशय सूत्रबद्ध असे प्रचाराचे नियोजन करत शहरातील सर्वच्या सर्व प्रभागातून रॅली काढत आपला ठसा व काँग्रेस पक्षाचे अस्तित्व शहरात दाखवून दिलेले आहे. जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांनी तर काँग्रेसचाच नगराध्यक्ष विजय मिळवेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे . त्यामुळे निवडणुकीचे नेमके काय निकाल लागतात यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.