शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर पुन्हा एस.टी.बसच्या धडकेत वृध्द ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:59 IST

अपघाताची मालिका सुरुच : मॉर्निंग वॉक करुन परतताना दिली धडक

जळगाव : मॉर्निंग वॉक नंतर घराकडे परतत असलेल्या रज्जाक मोहम्मद पटेल (७४ रा. ओमशांतीनगर, खोटेनगर) या वृध्दाला बसने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता महामार्गावर खोटे नगराजवळ घडली. दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी साडे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी देखील महामार्गावर जैन कंपनीजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत कंपनीच अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी महामार्गावर हा अपघात झाला.खोटेनगर परिसरातील ओम शांतीनगरात रज्जाक पटेल हे पत्नी सोफिया मुलगा हारुन यांच्यासह वास्तव्यास होते. हारुन हे मोहाडी येथील माध्यमिक विद्यालयात चित्रकला विषयाचे शिक्षक आहे. मुलगी गुलिस्ता हीचा विवाह झाला असून ती बारडोली, गुजरात येथे सासरी नांदते.नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी रज्जाक पटेल मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर फिरायला गेले होते. यानंतर ११ वाजता घराकडे परत येत असताना जळगावकडे येत असलेल्या कल्याण -रावेर बसने (एम.एच.१४, बी.टी.२३८१) रज्जाक पटेल यांना धडक दिली. यात पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना बसवरील वाहक किशोर मधुकर सोनवणे यांनी तत्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले.प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यात रक्तश्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती.दुपारी साडे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.अपघातानंतर बसचालक पोलीस ठाण्यात हजरअपघातानंतर बसचालक डिगंबर महाजन हे पोलीस ठाण्यात जमा झाले होते. पघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बस ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणली. खाजगी दवाखान्यातून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रज्जाक यांना मृत घोषीत करताच पत्नीसह मुलाने आक्रोश केला. बारडोली मुलगी हिस घटना कळविण्यात आली असून ती जळगावकडे येण्यास निघाली.महामार्गावर दहा दिवसात चार बळीराष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा दिवसात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे तर एक तरुण जखमी झाला. रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कंपनीत जात असताना जैन इरिगेशनचे सुपरवायझर राजेंद्र फत्तेसिंग वतपाल (५२) यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना विद्यापीठाच्या प्रवेशव्दारासमोर खड्डा चुकवण्यासाठी प्रयत्नातील दुचाकीस्वार नीलेश अशोक ठाकरे (वय ३४ , रा. निवृत्तीनगर) याला कारने जोरदार धडक दिली होती. वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.त्याआधी आठवडाभरापूर्वी पारोळाजवळ जैन कंपनीचेच कामगार शिरसोली येथील रहिवाशी पती-पत्नी हे दाम्पत्या ट्रकच्या धडकेत ठार झाले होते...तर वाचला असता जीवदरम्यान, सोमवारी रज्जाक पटेल यांना बसने धडक दिल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी समांतर रस्ता असता कदाचित रज्जाक पटेल याचा जीव वाचला असता, मात्र समांतर रस्ते नसल्याने आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे. रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे, अजून किती दिवस हे काम चालणार असाच प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव