शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:39 IST

गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअन्यथा भाजपाची काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाहीभाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा

फैजपूर, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.भाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा फैजपूर येथील खंडेराव वाडी मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी झाली. त्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना एकनाथराव खडसे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अस्मिता पाटील, जिल्हा कार्यवाहक अजय सूर्यवंशी होते.या वेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, मी नेहमी युतीच्या विरोधात होतो आणि युती तुटली म्हणून १२२ आमदार भाजपाचे निवडून आले. शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात बोलते, शिवसेना म्हणते, कर्जमाफीत घोटाळा झाला आहे, ज्यावेळेस कर्जमाफी दिली त्यावेळेस शिवसेना मंत्री त्यात सहभागी होते, मग त्यांनी विरोध का केला नाही? सत्तेत राहायचे, शिव्या द्यायच्या म्हणजे हे एखाद्या खट्याळ बाईसारखे शिवसेनेचे वागणे आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना कॉंग्रेस राष्ट्रावाडीचे सिंचन घोटाळे बाहेर काढले. मागील कॉंग्रेस सरकारने कामे केली नाही, असे नाही, पण त्यांनी १५ वर्षात पूर्ण देश, राज्य भ्रष्टाचाराने बोकाळले होते. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस जवळ संघटन नाही, त्यामुळे भाजपाचे आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपलीसुद्धा कॉंग्रेससारखी गत व्हायला वेळ लागणार नाही.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी, तर आभार विजय नरवाडे यांनी मानले. 

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर