शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:39 IST

गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअन्यथा भाजपाची काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाहीभाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा

फैजपूर, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.भाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा फैजपूर येथील खंडेराव वाडी मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी झाली. त्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना एकनाथराव खडसे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अस्मिता पाटील, जिल्हा कार्यवाहक अजय सूर्यवंशी होते.या वेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, मी नेहमी युतीच्या विरोधात होतो आणि युती तुटली म्हणून १२२ आमदार भाजपाचे निवडून आले. शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात बोलते, शिवसेना म्हणते, कर्जमाफीत घोटाळा झाला आहे, ज्यावेळेस कर्जमाफी दिली त्यावेळेस शिवसेना मंत्री त्यात सहभागी होते, मग त्यांनी विरोध का केला नाही? सत्तेत राहायचे, शिव्या द्यायच्या म्हणजे हे एखाद्या खट्याळ बाईसारखे शिवसेनेचे वागणे आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना कॉंग्रेस राष्ट्रावाडीचे सिंचन घोटाळे बाहेर काढले. मागील कॉंग्रेस सरकारने कामे केली नाही, असे नाही, पण त्यांनी १५ वर्षात पूर्ण देश, राज्य भ्रष्टाचाराने बोकाळले होते. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस जवळ संघटन नाही, त्यामुळे भाजपाचे आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपलीसुद्धा कॉंग्रेससारखी गत व्हायला वेळ लागणार नाही.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी, तर आभार विजय नरवाडे यांनी मानले. 

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर