शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:39 IST

गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअन्यथा भाजपाची काँग्रेस होण्यास वेळ लागणार नाहीभाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा

फैजपूर, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही मेहनत घेतली नाही. पण मनात कुठे तरी खंत आहे की राज्यात सरकार आणल,े पण मंत्रीपद सोडावे लागले. माझी आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही, कारण अशी परिस्थिती कायम राहिल्यास माझा स्वतंत्र निर्णय मी घेण्यास सक्षम असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.भाजपाच्या रावेर विधानसभा क्षेत्राचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख प्रशिक्षण कार्यशाळा फैजपूर येथील खंडेराव वाडी मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी झाली. त्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना एकनाथराव खडसे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अस्मिता पाटील, जिल्हा कार्यवाहक अजय सूर्यवंशी होते.या वेळी एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, मी नेहमी युतीच्या विरोधात होतो आणि युती तुटली म्हणून १२२ आमदार भाजपाचे निवडून आले. शिवसेना सत्तेत असून सरकारच्या विरोधात बोलते, शिवसेना म्हणते, कर्जमाफीत घोटाळा झाला आहे, ज्यावेळेस कर्जमाफी दिली त्यावेळेस शिवसेना मंत्री त्यात सहभागी होते, मग त्यांनी विरोध का केला नाही? सत्तेत राहायचे, शिव्या द्यायच्या म्हणजे हे एखाद्या खट्याळ बाईसारखे शिवसेनेचे वागणे आहे. मी विरोधी पक्ष नेता असताना कॉंग्रेस राष्ट्रावाडीचे सिंचन घोटाळे बाहेर काढले. मागील कॉंग्रेस सरकारने कामे केली नाही, असे नाही, पण त्यांनी १५ वर्षात पूर्ण देश, राज्य भ्रष्टाचाराने बोकाळले होते. सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस जवळ संघटन नाही, त्यामुळे भाजपाचे आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे अन्यथा आपलीसुद्धा कॉंग्रेससारखी गत व्हायला वेळ लागणार नाही.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विलास चौधरी, तर आभार विजय नरवाडे यांनी मानले. 

टॅग्स :PoliticsराजकारणFaizpurफैजपूर