शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : गेल्या काही ...

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतूवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीत घट झाली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायब झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली होती; मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या पूर्णपणे ब्रेक लागला.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमानाची सरासरी

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अंक्षांशावर व ८२ रेखांश वर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या महिन्यात तीन चक्रीवादळे निर्माण झाले होते. त्यानंतर अरबी समुद्रात नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा