शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : गेल्या काही ...

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतूवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीत घट झाली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायब झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली होती; मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या पूर्णपणे ब्रेक लागला.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमानाची सरासरी

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अंक्षांशावर व ८२ रेखांश वर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या महिन्यात तीन चक्रीवादळे निर्माण झाले होते. त्यानंतर अरबी समुद्रात नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा