शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : गेल्या काही ...

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतूवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीत घट झाली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायब झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली होती; मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या पूर्णपणे ब्रेक लागला.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमानाची सरासरी

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अंक्षांशावर व ८२ रेखांश वर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या महिन्यात तीन चक्रीवादळे निर्माण झाले होते. त्यानंतर अरबी समुद्रात नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा