शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

परिणामकारक शैलीतील ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:14 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये बुक शेल्फ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी रावसाहेब कुवर यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद’ या पुस्तकाचा करून दिलेला परिचय.

रावसाहेब कुंवर यांचा ‘हरवलेल्या आवाजाची फिर्याद’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. मुखपृष्ठ आणि शीर्षकापासूनच या संग्रहाच्या दर्जेदारपणाची जाणीव होते. हरवलेला आवाज..माणसाचा, अन्यायाच्या व्यवस्थेविरुद्धच्या असंतोषाचा, नाराजीचा हा आवाज टाहो फोडतो आहे पण तो आतल्या आत. इथल्या व्यवस्थेने तो मुसक्या आवळून बंद केलेला. बैल हे कदाचित प्रतीक असेल कवीच्या शेतीमातीशी एकरूपतेचं. व्यवस्थेशी एकनिष्ठ राहूनही शेतक:याच्या वाटेला आलेलं बैलासारखंच गाडा ओढत जगावं लागणा:या आयुष्याचं. एक कविता वाचली आणि झटक्यात पान उलटलं असं या संग्रहाबाबत होत नाही. ती कविता वाचकाला तिथेच रेंगाळत ठेवते, आपल्याला अस्वस्थ करते, कवितेतल्या वेदनेचा धागा आपल्याशी गुंफून टाकते. प्रत्येक कवितेगणीक हा धागा मग जाळं विणतच जातो. मधूनमधून जितेंद्र साळुंखे याची कवितेच्या आशयाला साजेशी चित्र वेदनेचा तोच स्वर व्यक्त करताना उठाव देऊन जातात.पहिल्याच ‘गाव झालंय गोगलगाय’ या कवितेत शहरातून आलेल्या तकलादू योजनांची गावासाठी असलेली शून्य किंमत आणि ग्लोबल होण्याच्या नादात गावाची गेलेली रया फार प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. बॅनरमधील माणसं, खेडय़ातली पोरं बसली आहेत येडय़ासारखी, गाव जगू देत नाही शहर तगू देत नाही, बापाला शहरात करमत नाही अशा अनेक कवितांनी शहरीकरणाच्या नादात हरवत चाललेली संवेदनशीलता अतिशय सहज परंतु परिणामकारक शैलीत व्यक्त केलेली आहे. कवी : रावसाहेब कुंवर, प्रकाशक : विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, पृष्ठे : 110, मूल्य 120 रुपये