शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

शिक्षणमंत्री जागे व्हा...जागे व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ...

जळगाव : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील महाविद्यालये त्वरित सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिक्षणमंत्री जागे व्हा, जागे व्हा...शिक्षणमंत्री कॅम्पस खोलो, उदय सामंत एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो़..., शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाबाजींनी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून टाकला होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील अशी अपेक्षा होती. पण, महाविद्यालये सुरू झाली नाहीत. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारद्वारे मद्याची दुकाने, मॉल, सिनेमागृह व परिवहन सेवा आणि राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु केल्या आहे, मग महाविद्यालय बंद का? असा प्रश्न उपस्थित करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने महाविद्यालय उघडा आंदोलन मंगळवारी केले.

यांचा होता आंदोलनात सहभाग

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या आंदोलनाला सुरूवात झाली होती. हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात अभाविप जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, सहमंत्री कल्पेश पाटील, आंदोलन प्रमुख संकेत सोनवणे, हेमांगिनी पाटील, गौरवी चौधरी, भूमिका कानडे, चिराग तायडे, शुभम शुक्ला, रितेश महाजन, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, मयूर अलकरी, ऋतिक माहुरकर, नितेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.