शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ, भगर, शेंगदाणे वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले आहे. सोयाबीन, शेंगदाणा तेलासह सूर्यफुलाच्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेंगदाणा, भगरच्या भावात वाढ झाली, मात्र या वेळी साबुदाणा स्थिर राहिला. या सोबतच इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असून गेल्या दोन महिन्यांपासून खाद्य तेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १२० ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १३० ते १४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

महाशिवरात्रीमुळे भाववाढ

महाशिवरात्रीनंतर शेंगदाणा, भगर, साबुदाणा यांची मागणी वाढली. यात भगरचे भाव वाढून ते १०० ते ११० तर शेंगदाण्याचे भाव १२५ ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले. मात्र साबुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

पालेभाज्यांचे भाव कमी

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी यावेळी भाजीपाल्याचे भाव कमीच आहे. कोथिंबीर ३५ रुपये किलो तर मेथीही ३५ रुपये किलोवर आहे.

कांदे खाताहेत भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २५ ते ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. मात्र कांद्याचे भाव अजूनही ३० ते ४० रुपयांच्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. टमाटे १५ रुपये प्रति किलोवर असून त्यांची आवक चांगली आहे.

खाद्य तेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- संजय चौधरी, ग्राहक

खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या भावात असलेली वाढ अजूनही कायम आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या हिरव्या पालेभाज्यांचे भाव स्थिर आहे. उन्हाळा असला तरी यंदा भाव कमी असल्याचे चित्र आहे.

- गणेश पाटील, भाजीपाला विक्रेते