शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अवकाळी पावसाने केळी बागांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 04:28 IST

केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

किरण चौधरी रावेर (जि. जळगाव) : गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे घटलेले केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा भाव आहे मात्र पीकच आलेले नाही, अशी स्थिती केळी उत्पादकांची झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादकांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे.गेल्यावर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत ट्युबवेल व विहीरींची पातळी तब्बल १०० मीटरच्या खाली घसरली होती. उन्हाळ्यात अतिउष्ण तापमानामुळे केळीबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या होत्या. देशभरातील तीन चतुर्थांश केळी उत्पादन रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा परिसरात होते. उत्पादनाअभावी यंदा केळीचे बाजारभाव १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. तुरळक शेतकऱ्यांना बाजारभावांचा लाभ झाला असला तरी, हाती उत्पादनच नसल्याने केळीचे विक्रमी बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले नाहीत.जुलै ते नोव्हेंबर दरम्यान सातत्याने ढगाळ वातावरण व संततधार पाऊस सुरू होता. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक वाढीची प्रक्रिया खुटली. शेतजमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने वाफसा होवू शकला नाही. त्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत ओलावा राहिल्याने केळीच्या मुळांचीही वाढ खुंटली आहे.>खरेदीला व्यापाºयांची नाकेळी बागांवर करपा घोंघावत आहे. केळीबाग उपटून फेकाव्या लागल्या आहेत. केळीच्या घडांवर व दांड्यावर ‘पीटस्पॉट’ रोगाचा प्रादुर्भाव होवून काळे ठिपके पडत आहेत. त्यामुळे केळी अपरिपक्व अवस्थेत पिकत असल्याने खरेदीला व्यापारी नकार देत आहे.>जुलै महिन्यापासून सतत पाच महिने ढगाळ वातावरण व पावसामुळे पाण्याचा निचरा न होणाºया जमिनीत वाफसा झाला नाही. करपा, पीटस्पॉट व सीएमव्हीची लागण झाल्याने केळीच्या उत्पादनासह गुणात्मक दर्जावरही परिणाम झाला आहे.- डॉ. के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ, जळगावकेळी निसवल्याने व सकाळी थंडीमुळे केळी पानांवर दवबिंदू राहत आहेत. करपा निर्मुलनाच्या फवारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे- सदानंद महाजन, निर्यातक्षम केळी उत्पादक, तांदलवाडी