शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

अवकाळी पावसाने केळी बागांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 04:28 IST

केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

किरण चौधरी रावेर (जि. जळगाव) : गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे घटलेले केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा भाव आहे मात्र पीकच आलेले नाही, अशी स्थिती केळी उत्पादकांची झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादकांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे.गेल्यावर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत ट्युबवेल व विहीरींची पातळी तब्बल १०० मीटरच्या खाली घसरली होती. उन्हाळ्यात अतिउष्ण तापमानामुळे केळीबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या होत्या. देशभरातील तीन चतुर्थांश केळी उत्पादन रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा परिसरात होते. उत्पादनाअभावी यंदा केळीचे बाजारभाव १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. तुरळक शेतकऱ्यांना बाजारभावांचा लाभ झाला असला तरी, हाती उत्पादनच नसल्याने केळीचे विक्रमी बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले नाहीत.जुलै ते नोव्हेंबर दरम्यान सातत्याने ढगाळ वातावरण व संततधार पाऊस सुरू होता. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक वाढीची प्रक्रिया खुटली. शेतजमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने वाफसा होवू शकला नाही. त्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत ओलावा राहिल्याने केळीच्या मुळांचीही वाढ खुंटली आहे.>खरेदीला व्यापाºयांची नाकेळी बागांवर करपा घोंघावत आहे. केळीबाग उपटून फेकाव्या लागल्या आहेत. केळीच्या घडांवर व दांड्यावर ‘पीटस्पॉट’ रोगाचा प्रादुर्भाव होवून काळे ठिपके पडत आहेत. त्यामुळे केळी अपरिपक्व अवस्थेत पिकत असल्याने खरेदीला व्यापारी नकार देत आहे.>जुलै महिन्यापासून सतत पाच महिने ढगाळ वातावरण व पावसामुळे पाण्याचा निचरा न होणाºया जमिनीत वाफसा झाला नाही. करपा, पीटस्पॉट व सीएमव्हीची लागण झाल्याने केळीच्या उत्पादनासह गुणात्मक दर्जावरही परिणाम झाला आहे.- डॉ. के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ, जळगावकेळी निसवल्याने व सकाळी थंडीमुळे केळी पानांवर दवबिंदू राहत आहेत. करपा निर्मुलनाच्या फवारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे- सदानंद महाजन, निर्यातक्षम केळी उत्पादक, तांदलवाडी