शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

पावसाळ्याच्या दीड महिन्यात धरणसाठ्यात केवळ १.०२ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरी सलग जोरदार पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध धरणांच्या साठ्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदाच्या पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरी सलग जोरदार पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध धरणांच्या साठ्यात केवळ १.०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर धरणसाठ्यांत किरकोळ वाढ होत असली तरी वाघूर धरणसाठ्यात तर पावसाळा सुरू झाल्यानंतर १.९४ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या गिरणा धरणात केवळ ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यांबाबत चिंता वाढत असल्याची स्थिती आहे.

हवामान खात्याने यंदा जून महिन्यात पावसाची सरासरी कमीच वर्तविली होती. त्यानुसार जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही, तसेच जुलै महिनादेखील निम्म्याहून अधिक उलटला असला तरी जिल्ह्यात सलग असा जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरण साठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत असल्याने जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांच्या साठ्यात केवळ १.०२ टक्केे वाढ होऊ शकली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता, तो १८ जुलैपर्यंत केवळ ३३.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.४२ टक्के होता.

गिरणा धरणात वाढीची अपेक्षा

नाशिक जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगाव तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणसाठ्यात यंदा अजूनही फारसी वाढ झालेली नाही. १ जून रोजी ३७.०२ टक्के जलसाठा असलेल्या या धरणात १८ रोजी ३७.०५ टक्के जलसाठा आहे. म्हणजे दीड महिन्यात केवळ ०.३ टक्क्यांनी या धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

‘मंगरूळ’ शंभरीकडे, ‘अग्नावती’मध्ये ठणठणाट

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी अग्नावती प्रकल्पामध्ये अजूनही शून्य टक्के साठा आहे. पावसाळ्याच्या अगोदरपासूनच या प्रकल्पासह हिवरा, बोरी प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा होता. त्यानंतर हिवरा धरणात १.०५ टक्के साठा, तर बोरी धरणात ४८.१२ टक्के जलसाठा झाला आहे. मन्याड धरणातही केवळ २१.०८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय अभोरा मध्यम प्रकल्पात ७८.४२ टक्के, मंगरूळ ९७.०३ टक्के, सुकी ८२.६५ टक्के, मोर ५६.८० टक्के, तोंडापूर ४२.८० टक्के, बहुळा १८.७१ टक्के, अंजनी २४.६१ टक्के, भोकरबारी १४.५९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. १३ मध्यम प्रकल्पांचा एकूण जलसाठा ४१.९० टक्के असून, गेल्या वर्षी हा साठा याच दिवशी ६२.११ टक्के होता. याशिवाय ९६ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ७.८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षी २४.९० टक्के होता.