शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जनतेच्या ‘संतापाच्या आगीत’ बळी घेणारे डंपर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:11 IST

हिंगोण्या जवळील अपघाताचे पडसाद : १२ जणांच्या मृत्यूमुळे लोकभावना भडकल्या

हिंगोणे, ता. यावल : रविवारी रात्री डंपरने जीपला धडक मारली आणि बारा जणांचे नाहक बळी गेले. ते अनेकांचे बळी घेणारे डंपर मंगळवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसले आहे. हे डंपर जाळले की जळाले याबाबत मात्र साशंकता असली तरी या अपघातामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून या संतापातच हे डंपर रात्रीतून काहींनी जाळले असावे, अशी चर्चा आहे.रविवारी रात्रीच्या सुमारास बºहाणपूर अंकलेश्वर या मार्गावर फैजपुर यावल दरम्यान हिंगोणा गावा जवळ झालेल्या अपघातील डंपर हे रस्त्याच्या बाजुुला कलंडलेले होते. मंगळवारी सकाळी ते जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले. डंपर जाळले की जळाले याबाबत मात्र साशंकता आहे.सदरची भिषण दुर्घटना ही डंपर चालकाच्या बाजुचे पुढील टायर फुटल्याचा कांगवा पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत करण्यात येत असतांनाच सदरचे डंपर कुणी पेटविले की पेटले ? हा विषय संपुर्ण तालुक्यात चर्चेचा बनला आहे .रविवारी रात्री झालेल्या अपघाताने परिसरातील नागरीकांना सुन्न करून टाकले असुन , भविष्यात अशा प्रकारे चे अपघात होवु नये याची काळजी घेणे सर्वांसाठी अत्यंत गरजे असल्याची प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहे .हिंगोणा येथे घटनास्थळी पाहणी पोलीस अधिक्षक (ठाणे) डॉ डिंगबर प्रधान, डीवायएसपी नजीर शेख (नाशिक), पोलीस निरीक्षक बच्छाव (धुळे ), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल मेढे, अफजल तडवी, गिरीष शिंदे, दत्तात्र ये गाळवे यांनी पाहणी केली.