शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावरील खोदलेल्या चाऱ्या ठरताहेत डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:28 IST

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर ...

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर अमृत अंतर्गत खोदकाम झाल्याने रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे आता जळगावकांना सांगण्याची गरज नाही. मात्र, खोदकाम झालेले रस्ते तरी किरकोळ पद्धतीने वाहनधारकांना वाहने चालविण्याइतपत योग्य करावेत इतकीही तत्परता मनपा प्रशासन किंवा मनपातील सत्ताधारी करताना दिसून येत नाही. स्वातंत्र्य चौक, पांडे चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावर अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित बुजविल्या गेल्या नसल्याने या चाऱ्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात मनपाकडून अनेक दिवस खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने या अडचणीत भर पडत आहे. स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका दरम्यानच्या रस्ता महिनाभरापूर्वी खोदण्यात आला होता. विशेष म्हणजे अमृत अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली आहे. यामुळे करण्यात आलेले खोदकाम रस्त्याचा मध्यभागी आहे. त्यातच मातीनेच चाऱ्या बुजविल्या गेल्यानंतर, या चाऱ्या डांबराव्दारे बुजविल्या गेल्या पाहिजे होत्या. मात्र, पंधरा दिवसांपासून या चाऱ्या बुजविल्या गेलेल्या नाहीत. मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चाऱ्या झाल्या दुभाजक

रस्त्याचा मध्यभागी या चाऱ्यांचे खोदकाम झाले असून, आता या चाऱ्याच दुभाजकांचे काम करत आहेत. त्यात वाहतूक शाखेने नेरी नाक्याजवळ चाऱ्यांच्या ठिकाणावरच बॅरिकेड‌्स लावले आहेत. त्यामुळे अनेकदा हे बॅरिकेड‌्सच वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. विशेष म्हणजे हे बॅरिकेड‌्स मनपाची निष्क्रियता लपविण्यासाठीच उभे केले असल्याचे वाटते. पंधरा दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती नाही. या चाऱ्यांमधून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

धूळ आणि अतिक्रमणाने वाढला त्रास

रस्त्याचे काम झालेले नाही, त्यातच चाऱ्या खोदल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असतानाच, नेरी नाका ते पांडे चौक दरम्यान अनेक वाहने थेट रस्त्यालगत उभी केली जातात. अनेकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या त्रासात जास्तच वाढ होते. खोदलेल्या चाऱ्या या डांबर, खडीने बुजविल्या गेल्या नसल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धूळदेखील उडत असते, यामुळे या रस्त्यावरून वाहने घेऊन जायलादेखील आता वाहनधारकांना विचार करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.