शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावरील खोदलेल्या चाऱ्या ठरताहेत डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:28 IST

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर ...

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर अमृत अंतर्गत खोदकाम झाल्याने रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे आता जळगावकांना सांगण्याची गरज नाही. मात्र, खोदकाम झालेले रस्ते तरी किरकोळ पद्धतीने वाहनधारकांना वाहने चालविण्याइतपत योग्य करावेत इतकीही तत्परता मनपा प्रशासन किंवा मनपातील सत्ताधारी करताना दिसून येत नाही. स्वातंत्र्य चौक, पांडे चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावर अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित बुजविल्या गेल्या नसल्याने या चाऱ्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात मनपाकडून अनेक दिवस खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने या अडचणीत भर पडत आहे. स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका दरम्यानच्या रस्ता महिनाभरापूर्वी खोदण्यात आला होता. विशेष म्हणजे अमृत अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली आहे. यामुळे करण्यात आलेले खोदकाम रस्त्याचा मध्यभागी आहे. त्यातच मातीनेच चाऱ्या बुजविल्या गेल्यानंतर, या चाऱ्या डांबराव्दारे बुजविल्या गेल्या पाहिजे होत्या. मात्र, पंधरा दिवसांपासून या चाऱ्या बुजविल्या गेलेल्या नाहीत. मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चाऱ्या झाल्या दुभाजक

रस्त्याचा मध्यभागी या चाऱ्यांचे खोदकाम झाले असून, आता या चाऱ्याच दुभाजकांचे काम करत आहेत. त्यात वाहतूक शाखेने नेरी नाक्याजवळ चाऱ्यांच्या ठिकाणावरच बॅरिकेड‌्स लावले आहेत. त्यामुळे अनेकदा हे बॅरिकेड‌्सच वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. विशेष म्हणजे हे बॅरिकेड‌्स मनपाची निष्क्रियता लपविण्यासाठीच उभे केले असल्याचे वाटते. पंधरा दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती नाही. या चाऱ्यांमधून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

धूळ आणि अतिक्रमणाने वाढला त्रास

रस्त्याचे काम झालेले नाही, त्यातच चाऱ्या खोदल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असतानाच, नेरी नाका ते पांडे चौक दरम्यान अनेक वाहने थेट रस्त्यालगत उभी केली जातात. अनेकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या त्रासात जास्तच वाढ होते. खोदलेल्या चाऱ्या या डांबर, खडीने बुजविल्या गेल्या नसल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धूळदेखील उडत असते, यामुळे या रस्त्यावरून वाहने घेऊन जायलादेखील आता वाहनधारकांना विचार करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.