शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लग्नसराईमुळे वांगे वधारले, किराणा साहित्याचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मोठी मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट दुप्पट झाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये प्रति किलोवर असलेले वांगे ४० रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच टमाटे, कोथिंबीरही चांगलेच वधारले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या आठवड्यात केवळ चंपाषष्टीमुळे भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढले होते.

या आठवड्यात मात्र कांदे, बटाटे वगळता इतर भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात बहुतांश वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. साखर ३८ रुपये, रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये प्रति किलोवर आहे.

कांदा-बटाट्याचे भाव कमी

गेल्या अनेक दिवसांपासून कांदे-बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ४० रुपयांवर आले होते. आता ते ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत. तसेच कांदेदेखील ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

गाजरचे भाव वधारले

गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ ते ३० रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर महागली

गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरचे भाव चांगलेच कमी झाले होते. आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपये प्रति किलो असलेल्या कोथिंबीरचे भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टमाट्याचेदेखील भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

लग्नसराईत भाजीसाठी वांग्यांना जास्त पसंती असते. त्यामुळे वांग्याचे व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने तसेच किराणा साहित्याचेही भाव वाढल्याने बोजा वाढत आहे.

- संजय सपकाळे, ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या मागणी वाढत असल्याने भावदेखील वाढत आहे.

- प्रवीण पगारिया, व्यापारी

लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहेत. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत.

- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते