शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

लग्नसराईमुळे वांगे वधारले, किराणा साहित्याचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मोठी मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट दुप्पट झाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये प्रति किलोवर असलेले वांगे ४० रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच टमाटे, कोथिंबीरही चांगलेच वधारले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या आठवड्यात केवळ चंपाषष्टीमुळे भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढले होते.

या आठवड्यात मात्र कांदे, बटाटे वगळता इतर भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात बहुतांश वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. साखर ३८ रुपये, रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये प्रति किलोवर आहे.

कांदा-बटाट्याचे भाव कमी

गेल्या अनेक दिवसांपासून कांदे-बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ४० रुपयांवर आले होते. आता ते ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत. तसेच कांदेदेखील ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

गाजरचे भाव वधारले

गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ ते ३० रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर महागली

गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरचे भाव चांगलेच कमी झाले होते. आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपये प्रति किलो असलेल्या कोथिंबीरचे भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टमाट्याचेदेखील भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

लग्नसराईत भाजीसाठी वांग्यांना जास्त पसंती असते. त्यामुळे वांग्याचे व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने तसेच किराणा साहित्याचेही भाव वाढल्याने बोजा वाढत आहे.

- संजय सपकाळे, ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या मागणी वाढत असल्याने भावदेखील वाढत आहे.

- प्रवीण पगारिया, व्यापारी

लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहेत. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत.

- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते