शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लग्नसराईमुळे वांगे वधारले, किराणा साहित्याचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मोठी मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट दुप्पट झाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये प्रति किलोवर असलेले वांगे ४० रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच टमाटे, कोथिंबीरही चांगलेच वधारले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या आठवड्यात केवळ चंपाषष्टीमुळे भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढले होते.

या आठवड्यात मात्र कांदे, बटाटे वगळता इतर भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात बहुतांश वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. साखर ३८ रुपये, रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये प्रति किलोवर आहे.

कांदा-बटाट्याचे भाव कमी

गेल्या अनेक दिवसांपासून कांदे-बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ४० रुपयांवर आले होते. आता ते ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत. तसेच कांदेदेखील ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

गाजरचे भाव वधारले

गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ ते ३० रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर महागली

गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरचे भाव चांगलेच कमी झाले होते. आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपये प्रति किलो असलेल्या कोथिंबीरचे भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टमाट्याचेदेखील भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

लग्नसराईत भाजीसाठी वांग्यांना जास्त पसंती असते. त्यामुळे वांग्याचे व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने तसेच किराणा साहित्याचेही भाव वाढल्याने बोजा वाढत आहे.

- संजय सपकाळे, ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या मागणी वाढत असल्याने भावदेखील वाढत आहे.

- प्रवीण पगारिया, व्यापारी

लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहेत. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत.

- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते