शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:42 IST

केळीला सर्वाधिक तडाखा

जळगाव : जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५०.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.गेल्या रविवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिल्याने पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, केळी, लिंबू यासह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे ७५ गावातील ४९३ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात बाधीत सुमारे २५०.६५ हेक्टरवर शेतशिवारांचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला हा अहवाल आज प्राप्त झाला असून शेतकºयांना वादळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.केळी सर्वाधिक फटकाजिल्ह्याभरात झालेल्या वादळीपावसामुळे सर्वाधिक फटका केळी ला बसला असून जिल्हाभरातील ७३ गावांमधील २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक ६३ गावांमधील १६१.४५ हेक्टरवरील केळी बाधीत झाली आहे. त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ४६ हेक्टर तर यावल तालुक्यात ०.५० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.मक्याचेही नुकसानवादळी पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र निवडणूक कामामुळे पंचनामा मागे पडले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. त्यानंतर पंचनामे सुरू झाले व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झाला. यात केळी खालोखाल २२.७ हेक्टरवरील मक्याचेही नुकसान झाले आहे. यात अधिक प्रमाण जळगाव तालुक्यात असून ८ गावातील ८५ शेतकºयांच्या १५ हेक्टरवरील मक्याला फटका बसला.या सोबतच चोपडा तालुक्यात १३ हेक्टरवरील लिंबू, याच तालुक्यात ३ हेक्टरवरील बाजरीला तसेच चोपड्यासह जामनेर तालुक्यात एकूण चार हेक्टरवरील फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Jalgaonजळगाव