शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:42 IST

केळीला सर्वाधिक तडाखा

जळगाव : जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५०.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.गेल्या रविवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिल्याने पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, केळी, लिंबू यासह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे ७५ गावातील ४९३ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात बाधीत सुमारे २५०.६५ हेक्टरवर शेतशिवारांचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला हा अहवाल आज प्राप्त झाला असून शेतकºयांना वादळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.केळी सर्वाधिक फटकाजिल्ह्याभरात झालेल्या वादळीपावसामुळे सर्वाधिक फटका केळी ला बसला असून जिल्हाभरातील ७३ गावांमधील २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक ६३ गावांमधील १६१.४५ हेक्टरवरील केळी बाधीत झाली आहे. त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ४६ हेक्टर तर यावल तालुक्यात ०.५० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.मक्याचेही नुकसानवादळी पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र निवडणूक कामामुळे पंचनामा मागे पडले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. त्यानंतर पंचनामे सुरू झाले व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झाला. यात केळी खालोखाल २२.७ हेक्टरवरील मक्याचेही नुकसान झाले आहे. यात अधिक प्रमाण जळगाव तालुक्यात असून ८ गावातील ८५ शेतकºयांच्या १५ हेक्टरवरील मक्याला फटका बसला.या सोबतच चोपडा तालुक्यात १३ हेक्टरवरील लिंबू, याच तालुक्यात ३ हेक्टरवरील बाजरीला तसेच चोपड्यासह जामनेर तालुक्यात एकूण चार हेक्टरवरील फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Jalgaonजळगाव