शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विद्यार्थ्यांच्या अर्जांमुळे विद्यापीठात असेही घडले, सुटीच्या दिवशीही कामकाज चालले!

By अमित महाबळ | Updated: September 17, 2023 15:28 IST

इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे.

अमित महाबळ, जळगाव : शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हते, त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सुटीच्या दिवशी काम करून सुमारे २५० पदवी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप केले. त्यामुळे इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे.

राज्यात २०१७ पासून सुमारे ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अनेक पात्रताधारक उमेदवार नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याची मुदत सुरूवातीला १५ सप्टेंबरपर्यंत होती. ती नंतर वाढवून दि. २२ सप्टेंबर करण्यात आली आहे. नोंदणी करताना उमेदवारांना गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्राच्या प्रती पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत. मात्र, काही जणांकडे पदवी प्रमाणपत्राची प्रत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. या संदर्भात विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठाला निवेदन देऊन नियमानुसार शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी तातडीने पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. अर्ज करताच प्रमाणपत्रे

विद्यार्थ्यांची निकड आणि वेळेचा अभाव लक्षात घेऊन परीक्षा विभागाने शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामकाज केले आणि २५० पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. ही प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात आहेत. अर्ज करताच आठवडाभरात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :universityविद्यापीठ