शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

सचिन देव जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता ...

सचिन देव

जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता रक्षाबंधनामुळे तर मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जाण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे या आठवड्यात जळगावहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असून, स्थानिक प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे उभे राहुन किंवा इतर खाजगी प्रवासी वाहनांचा आधार बाहेरगावी जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या स्थगित केल्या होत्या. त्या गाड्या आता प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यानांही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, तिकीट आरक्षणाची सक्ती केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांनी गेल्या महिन्यापासून तिकीट आरक्षण करण्याला प्राधान्य दिले होते. परिणामी यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सध्या सुरू असलेल्या व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

इन्फो :

५० टक्के प्रवासी संख्या वाढली

- जूनपासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरू असून, आता १५ ऑगस्ट सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा उद्योग-व्यावसायानिमित्त पुणे-मुंबई येथे जात असल्याने, गाड्यांना गर्दी वाढली आहे.

- अनलॉकनंतर अनेक नागरिक रखडलेले लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम करित आहेत. त्यामुळेही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेे गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.

- गेल्या वर्षी कोरोनामुळे खाजगी प्रवासी वाहतूक व रेल्वेही बंद असल्यामुळे महिलांना रक्षाबंधनाला माहेरी जाता आले नाही. यंदा रक्षाबंधनाला मात्र अनलॉक असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग करून ठेवल्यामुळे गाड्यांना गर्दी वाढली आहे.

इन्फो :

गा गाड्यांना वेटिंग