शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

सचिन देव जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता ...

सचिन देव

जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता रक्षाबंधनामुळे तर मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जाण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे या आठवड्यात जळगावहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असून, स्थानिक प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे उभे राहुन किंवा इतर खाजगी प्रवासी वाहनांचा आधार बाहेरगावी जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या स्थगित केल्या होत्या. त्या गाड्या आता प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यानांही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, तिकीट आरक्षणाची सक्ती केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांनी गेल्या महिन्यापासून तिकीट आरक्षण करण्याला प्राधान्य दिले होते. परिणामी यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सध्या सुरू असलेल्या व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.

इन्फो :

५० टक्के प्रवासी संख्या वाढली

- जूनपासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरू असून, आता १५ ऑगस्ट सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा उद्योग-व्यावसायानिमित्त पुणे-मुंबई येथे जात असल्याने, गाड्यांना गर्दी वाढली आहे.

- अनलॉकनंतर अनेक नागरिक रखडलेले लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम करित आहेत. त्यामुळेही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेे गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.

- गेल्या वर्षी कोरोनामुळे खाजगी प्रवासी वाहतूक व रेल्वेही बंद असल्यामुळे महिलांना रक्षाबंधनाला माहेरी जाता आले नाही. यंदा रक्षाबंधनाला मात्र अनलॉक असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग करून ठेवल्यामुळे गाड्यांना गर्दी वाढली आहे.

इन्फो :

गा गाड्यांना वेटिंग