शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

चाळीसगाव : शहर दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. एक डोंगरी, तर दुसरी तितूर. शहराच्या मध्यभागी या दोन्ही नद्यांचा ज्या ...

चाळीसगाव : शहर दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. एक डोंगरी, तर दुसरी तितूर. शहराच्या मध्यभागी या दोन्ही नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, तेथे विस्तीर्ण नदी पात्र आहे. या संगमावर कधीकाळी काचेसारखे स्वच्छ पाणी, पाण्यातील चमकणारे मासे व आजूबाजूला मोठी झाडे ही शहराच्या नदीची खरी ओळख होती. मात्र आता पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब झाले असून, रासायनिक पाणी, सांडपाणी आणि त्यात वाढलेले बाभळीचे रान त्यामुळे याठिकाणी उकिरडे तयार होऊन दुर्गंधी सुटली आहे.

दोन गटारांचा संगम झालेल्या ठिकाणी सध्या भीषण वास्तव दिसून येते. शहरातील पूर्व-पश्चिम भागातील सांडपाण्यासह विविध छोट्या-मोठ्या कारखान्यांमधून सोडले जाणारे विनाप्रक्रिया घातक रासायनिक पाणी यामुळे या दोन नद्या मृत झाल्या आहेत. काठावर उभे राहिले तर पाण्यातून येणारी प्रचंड दुर्गंधी, असह्य करणारी आहे. साबणाच्या पाण्यासारखा फेस मोठ्या प्रमाणात प्रवाहात दिसून येतो. शहरातील सर्व डंपिंग कचरा या नदीपात्रात पडल्याने घाणेरडा, कुबट वास येतोय. आजूबाजूला दोन्ही बाजूंनी उकिरडे तयार झाले आहे. त्यातच वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचरा नदीपात्रात फोफावला आहे.

पुलावर बसणारे भाजी, फळ, मांस विक्रेते संध्याकाळी घरी परत जाताना सडलेल्या मांसासह विविध भाज्या व कचरा याच नदीपात्रात टाकून जातात. कधीकाळी शहराची ओळख असणारे हे नदीपात्र, आज भयावह स्थितीत पोहोचले आहे. काही दिवसांच्या अंतरावर येणाऱ्या पावसाळ्यात सफाई व खोलीकरण करण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी पूर येण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असेल व आजूबाजूच्या दुकानात हे सांडपाणी जाऊन नुकसान होईल, अशी भावना नागरिक व दुकानदार यांनी व्यक्त केली.

तितूर नदीपात्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र गायबच झाले आहे. पालिका विभाग यांनी शहरातून जाणाऱ्या नदीच्या पात्राची रुंदी निश्चित केली नसल्यामुळे अन् नुकताच नदीवर बांधण्यात आलेला चित्रविचित्र आकाराचा लोखंडी पूल व त्याची लांबी पाहता या नदीचे पात्र किती आहे, याचा अंदाज सहज येतो. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब झाले अन् विद्रुपीकरण झाले आहे. पूररेषेची आखणी केलेली नाही. तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला तर प्रत्येक वर्षी त्याचा फटका परिसरात राहणाऱ्या लोकांना बसतो.

...................

चौकट..

प्रशासनाच्या चुकांमुळे येतो अचानक पूर?

चाळीसगाव नगरपालिकेच्या नियोजनाअभावी व चुकांमुळे शहरातील तितूर नदीला पूर येतो. या पुराचे पाणी नदी शेजारील अनेक घरे, दुकानांमध्ये शिरते. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडते व प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते. या घटनेची माहिती पालिकेला अन् लोकप्रतिनिधी असूनही पूर आल्यावर जागे होताना दिसत आहे. छोट्या गुजरीतील पूल व हॉटेल दयानंदजवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे. त्यामुळे वरून येणारे पाणी जास्त आणि पुलाखालून जाणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाऊन त्याचा ओव्हर फ्लो आजूबाजूला होतो. त्यामुळेच दुकानात पाणी जाते, असे स्पष्ट दिसते. मात्र यावर कायमचा उपाय करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

................................

नदी स्वच्छतेसाठी दुकानदार, नागरिकांच्या सूचना..

नदीची पूररेषा व सर्व्हे नक्की केला पाहिजे. नदीतील अतिक्रमणे काढली पाहिजेत. नदीपात्रात गटारींचे पाणी सोडणे थांबवावे. नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करावा. नदी प्रदूषणमुक्त करण्याकडेदेखील लक्ष द्यावे. त्यामुळे पूर आल्यावर दुकानात पाणी जाणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे.

- मयूर फुलदेवरे, दुकानदार

शहरात दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी-नाल्यांमधून गाळ उपसण्याचे काम करण्यात यावे. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के आणि पावसाळा व त्यानंतरच्या काळात ३० टक्के सफाई करण्यात यावी. पावसाळ्यात पुराचे पाणी परिसरात पसरणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

-विक्रांत तिवारी, नागरिक

...

===Photopath===

240521\24jal_4_24052021_12.jpg~240521\24jal_5_24052021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव शहरातून तितुर नदीपात्रात वाढलेली वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई व खोलीकरण करण्याची मागणी दुकानदार व नागरिकांकडून होत आहे.~चाळीसगाव शहरातून तितुर नदीपात्रात वाढलेली वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई व खोलीकरण करण्याची मागणी दुकानदार व नागरिकांकडून होत आहे.