शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील विविध कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू असून, शुक्रवारी बसमध्ये शासनाच्या सूचनेनुसार २२ प्रवासी न मिळाल्याने बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांना घेऊन या बसेस बाहेरगावी रवाना होताना दिसून आल्या.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदीत अधिकच कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली असून, सरकारी सेवेसह खाजगी प्रवासी वाहतूक सेवेत ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंतरजिल्हा प्रवासासाठी संबंधित प्रवाशाला प्रवासासाठी शासनाच्या परवानगीचा पास सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर जिल्ह्यात जातांना ॲन्टिजेन चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणेही गरजेचे केले आहे. शासनाने ३० तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अतिशय कडक नियम लागू केल्याने याचा परिणाम सरकारी प्रवासी वाहतूक सेवेसह खासगी प्रवासी वाहतूक सेवेवरही झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरातून नियमित पुणे व मुंबईला सेवा देणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या १०० ते १२५ ट्रॅव्हल्स बंद

जळगाव शहरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स जात असतात आणि तिकडूनही तितक्याच ट्रॅव्हल्स जळगावला येत असतात. दोन्ही मार्गांवर १०० ते १२५ ट्रॅव्हल्स धावत असतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. या बंदमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याच्या भावना शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, शासनाच्या नियमांचे पालन करीत शहरातील फक्त दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे पुण्याची सेवा चालविण्यात येत असल्याचे सांगितले.

इन्फो :

शासनाने ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्के प्रवाशांची केलेली सक्ती, तसेच प्रवाशांना जिल्हा अंतर्गत प्रवासाला केलेली बंदी, त्यात ॲन्टिजेन चाचणीची सक्ती यामुळे प्रवाशांकडूनच अल्प प्रतिसाद आहे. त्यात ट्रॅव्हल्स मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेप्रमाणे वाहतूक करणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमोद झांबरे, सचिव, जळगाव जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन.

इन्फो :

तर बसेसला २२ प्रवासीही मिळेना

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे सध्या जिल्हा अंतर्गतच अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू आहेत. तसेच या बसेसमध्येही शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारपासून ५० टक्केच प्रवासी आसन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी जळगाव आगारातून मुक्ताईनगर, जामनेर व धुळे येथे रवाना होणाऱ्या बसेसमध्ये ५० टक्के क्षमतेनुसार २२ प्रवासीही बसलेले आढळून आले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करताना आढळून आले.