शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील विविध कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू असून, शुक्रवारी बसमध्ये शासनाच्या सूचनेनुसार २२ प्रवासी न मिळाल्याने बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांना घेऊन या बसेस बाहेरगावी रवाना होताना दिसून आल्या.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदीत अधिकच कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली असून, सरकारी सेवेसह खाजगी प्रवासी वाहतूक सेवेत ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंतरजिल्हा प्रवासासाठी संबंधित प्रवाशाला प्रवासासाठी शासनाच्या परवानगीचा पास सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर जिल्ह्यात जातांना ॲन्टिजेन चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणेही गरजेचे केले आहे. शासनाने ३० तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अतिशय कडक नियम लागू केल्याने याचा परिणाम सरकारी प्रवासी वाहतूक सेवेसह खासगी प्रवासी वाहतूक सेवेवरही झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरातून नियमित पुणे व मुंबईला सेवा देणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या १०० ते १२५ ट्रॅव्हल्स बंद

जळगाव शहरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स जात असतात आणि तिकडूनही तितक्याच ट्रॅव्हल्स जळगावला येत असतात. दोन्ही मार्गांवर १०० ते १२५ ट्रॅव्हल्स धावत असतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. या बंदमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याच्या भावना शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, शासनाच्या नियमांचे पालन करीत शहरातील फक्त दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे पुण्याची सेवा चालविण्यात येत असल्याचे सांगितले.

इन्फो :

शासनाने ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्के प्रवाशांची केलेली सक्ती, तसेच प्रवाशांना जिल्हा अंतर्गत प्रवासाला केलेली बंदी, त्यात ॲन्टिजेन चाचणीची सक्ती यामुळे प्रवाशांकडूनच अल्प प्रतिसाद आहे. त्यात ट्रॅव्हल्स मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेप्रमाणे वाहतूक करणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमोद झांबरे, सचिव, जळगाव जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन.

इन्फो :

तर बसेसला २२ प्रवासीही मिळेना

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे सध्या जिल्हा अंतर्गतच अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू आहेत. तसेच या बसेसमध्येही शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारपासून ५० टक्केच प्रवासी आसन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी जळगाव आगारातून मुक्ताईनगर, जामनेर व धुळे येथे रवाना होणाऱ्या बसेसमध्ये ५० टक्के क्षमतेनुसार २२ प्रवासीही बसलेले आढळून आले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करताना आढळून आले.