शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील विविध कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू असून, शुक्रवारी बसमध्ये शासनाच्या सूचनेनुसार २२ प्रवासी न मिळाल्याने बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांना घेऊन या बसेस बाहेरगावी रवाना होताना दिसून आल्या.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदीत अधिकच कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली असून, सरकारी सेवेसह खाजगी प्रवासी वाहतूक सेवेत ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंतरजिल्हा प्रवासासाठी संबंधित प्रवाशाला प्रवासासाठी शासनाच्या परवानगीचा पास सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर जिल्ह्यात जातांना ॲन्टिजेन चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणेही गरजेचे केले आहे. शासनाने ३० तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अतिशय कडक नियम लागू केल्याने याचा परिणाम सरकारी प्रवासी वाहतूक सेवेसह खासगी प्रवासी वाहतूक सेवेवरही झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरातून नियमित पुणे व मुंबईला सेवा देणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या १०० ते १२५ ट्रॅव्हल्स बंद

जळगाव शहरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स जात असतात आणि तिकडूनही तितक्याच ट्रॅव्हल्स जळगावला येत असतात. दोन्ही मार्गांवर १०० ते १२५ ट्रॅव्हल्स धावत असतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. या बंदमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याच्या भावना शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, शासनाच्या नियमांचे पालन करीत शहरातील फक्त दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे पुण्याची सेवा चालविण्यात येत असल्याचे सांगितले.

इन्फो :

शासनाने ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्के प्रवाशांची केलेली सक्ती, तसेच प्रवाशांना जिल्हा अंतर्गत प्रवासाला केलेली बंदी, त्यात ॲन्टिजेन चाचणीची सक्ती यामुळे प्रवाशांकडूनच अल्प प्रतिसाद आहे. त्यात ट्रॅव्हल्स मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेप्रमाणे वाहतूक करणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमोद झांबरे, सचिव, जळगाव जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन.

इन्फो :

तर बसेसला २२ प्रवासीही मिळेना

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे सध्या जिल्हा अंतर्गतच अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू आहेत. तसेच या बसेसमध्येही शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारपासून ५० टक्केच प्रवासी आसन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी जळगाव आगारातून मुक्ताईनगर, जामनेर व धुळे येथे रवाना होणाऱ्या बसेसमध्ये ५० टक्के क्षमतेनुसार २२ प्रवासीही बसलेले आढळून आले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करताना आढळून आले.