शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:31 IST

जळके येथील स्थिती

ठळक मुद्दे पुरेसा पाऊस झाल्यास विविध बांधांमधील पाणी पुरते एप्रिलपर्यंत गुरांसाठी पाणी मिळविण्याकरीता विहिर मालकाच्या शेतात मजुरी

सुशील देवकरजळगाव : तालुक्यातील जळके येथे लोकसहभागातून तसेच शासनाकडूनही जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वीच लहान-मोठे ११ बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागीलवर्षी या परिसरात पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरणातून दरवर्षी ओव्हर-फ्लो होऊन येणारे पाणी आलेच नाही. त्यामुळे हे सर्वच बांध कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेद्वारे टंचाईशी लढा देण्याची घोषणाही जळके परिसरात पाऊसच न झाल्याने निरूपयोगी ठरली आहे.लोकसहभागातून झाले होते कामआर्ट आॅफ लिव्हिंग, जैन इरिगेशनचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व लोकवर्गणीतून बोढरे नाल्यावर (नदीवर) जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जैन इरिगेशनने ४५ दिवस पोकलॅण्ड मशीन मोफत दिले. तर आर्ट आॅफ लिव्हींगने डिझेलसाठी ५० हजार रूपये दिले. तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बोढरे नाल्यावर (नदीवर) ९, तसेच गलाटी नाल्यावर २ असे ११ लहान मोठे बंधारे बांधले होते. तसेच त्याच्या दुसऱ्या वर्षीही या बंधाºयांचा गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. २०१५ व १६ असे दोन वर्ष जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे पाण्याने भरले होते. त्यामुळे विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. गुरांसाठी पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. मात्र मागील वर्षी व यंदाही हे बंधारे कोरडेठाकच राहिल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खाजगी विहिरींवरून पाणी भरावे लागत आहे.मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेटजलयुक्त शिवार योजनेंतर्गत जळके येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण व बंधाºयाचे काम करण्यात आले होते. बोढरी नदीवर दोन बंधारे लोकसहभागातून करण्यात आले होते. त्याचे जलपूजन २० जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०१६ मध्येही या बंधाºयांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरण ओव्हर-फ्लो न झाल्याने या बंधाºयांमध्ये पाणीसाठाच झालेला नाही. त्यामुळे हे बंधारे कोरडेठाक पडले आहेत.कोल्हापूर बंधारा दुरूस्तीकडे दूर्लक्षबोढरे नाल्यावरच कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही १०-१२ वर्षांपूर्वी बांधला होता. २०१३-१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तो फुटला असून गळती लागली आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. आता जलयुक्त शिवार योजनेच्या निधीतूनच त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्यापही कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे काम या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात जोरदार पाऊस झाला तरीही पाणी साठणे शक्य नाही.बागायती क्षेत्रावर परिणामजळके परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाºयांमध्ये पाणी साठल्यानंतर बागायती क्षेत्रात दुप्पट वाढ झाली होती. दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीसाठाच न झाल्याने यावर विपरित परिणाम झाला आहे.