शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:31 IST

जळके येथील स्थिती

ठळक मुद्दे पुरेसा पाऊस झाल्यास विविध बांधांमधील पाणी पुरते एप्रिलपर्यंत गुरांसाठी पाणी मिळविण्याकरीता विहिर मालकाच्या शेतात मजुरी

सुशील देवकरजळगाव : तालुक्यातील जळके येथे लोकसहभागातून तसेच शासनाकडूनही जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वीच लहान-मोठे ११ बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागीलवर्षी या परिसरात पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरणातून दरवर्षी ओव्हर-फ्लो होऊन येणारे पाणी आलेच नाही. त्यामुळे हे सर्वच बांध कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेद्वारे टंचाईशी लढा देण्याची घोषणाही जळके परिसरात पाऊसच न झाल्याने निरूपयोगी ठरली आहे.लोकसहभागातून झाले होते कामआर्ट आॅफ लिव्हिंग, जैन इरिगेशनचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व लोकवर्गणीतून बोढरे नाल्यावर (नदीवर) जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जैन इरिगेशनने ४५ दिवस पोकलॅण्ड मशीन मोफत दिले. तर आर्ट आॅफ लिव्हींगने डिझेलसाठी ५० हजार रूपये दिले. तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बोढरे नाल्यावर (नदीवर) ९, तसेच गलाटी नाल्यावर २ असे ११ लहान मोठे बंधारे बांधले होते. तसेच त्याच्या दुसऱ्या वर्षीही या बंधाºयांचा गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. २०१५ व १६ असे दोन वर्ष जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे पाण्याने भरले होते. त्यामुळे विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. गुरांसाठी पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. मात्र मागील वर्षी व यंदाही हे बंधारे कोरडेठाकच राहिल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खाजगी विहिरींवरून पाणी भरावे लागत आहे.मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेटजलयुक्त शिवार योजनेंतर्गत जळके येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण व बंधाºयाचे काम करण्यात आले होते. बोढरी नदीवर दोन बंधारे लोकसहभागातून करण्यात आले होते. त्याचे जलपूजन २० जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०१६ मध्येही या बंधाºयांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरण ओव्हर-फ्लो न झाल्याने या बंधाºयांमध्ये पाणीसाठाच झालेला नाही. त्यामुळे हे बंधारे कोरडेठाक पडले आहेत.कोल्हापूर बंधारा दुरूस्तीकडे दूर्लक्षबोढरे नाल्यावरच कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही १०-१२ वर्षांपूर्वी बांधला होता. २०१३-१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तो फुटला असून गळती लागली आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. आता जलयुक्त शिवार योजनेच्या निधीतूनच त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्यापही कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे काम या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात जोरदार पाऊस झाला तरीही पाणी साठणे शक्य नाही.बागायती क्षेत्रावर परिणामजळके परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाºयांमध्ये पाणी साठल्यानंतर बागायती क्षेत्रात दुप्पट वाढ झाली होती. दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीसाठाच न झाल्याने यावर विपरित परिणाम झाला आहे.