शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

मालवाहतूकीमुळे एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने ...

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने माल वाहतुकीच्या उत्पन्नावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यांच्या लॉकडाऊन मध्ये मालवाहतूकीतून जळगाव विभागाला तब्बल १८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, एकीकडे मालवाहतुकीतून महामंडळ मालामाल होत असताना, दुसरीकडे बाहेरगावी ट्रक नेल्यानंतर, जो पर्यंत परतीचा माल मिळत नाही, तो पर्यंत या चालकांना चार ते पाच दिवस बाहेरगावी थांबावे लागत असल्याने, त्यांचा वैयक्तिक खर्च वाढला असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे मालवाहतूकीतून महामंडळ मालामाल आणि चालक मात्र कंगाल होत असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षापासून महामंडळाच्या प्रवासी सेवावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीची सेवा सुरू केली आहे. सुरुवातीपासून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जळगाव विभागाने एक कोटींहुन अधिक उत्पन्न मिळवले आहे. पूर्वी प्रमाणे चालकांना एका दिवसात घराकडे परत येता येत नसून, परतीचा माल मिळाल्यावरच घराकडे येण्याचे महामंडळाने काढले आहेत. त्यामुळे या चालकांना चार दिवस तर कधी आठ दिवसांपर्यंत बाहेरगावी रहावे लागत आहे. बाहेरगावी राहण्याचा ॲडव्हान्स महामंडळातर्फे देण्यात येत असला तरी, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्यामुळे चालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

कोरोना काळात १८ लाखांची कमाई

- गेल्यावर्षा प्रमाणे यंदाही लॉकडाऊनमध्ये महामंडळाची मालवाहतुक सेवा यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्याभरात १८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

- महामंडळाकडून जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरात कुठेही माल पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे भाड्यापोटी सहजच एक लाखांच्या घरात उत्पन्न येत आहे

-या ट्रकद्वारे विविध व्यापारी व उद्योजकांचा कच्चा माल, सरकारी रेशनिंग माल, बी-बियाणे, किराणा माल आदी मालाची वाहतूक करून, त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे.

इन्फो :

परतीचा माल मिळेपर्यंत बाहेरगावीच मुक्काम

- पूर्वी संबंधित गावाला माल पोहचविल्यानंतर, चालकांना लागलीच ट्रक घेऊन पुन्हा जळगावकडे येता येत होते. मात्र, आता नव्या धोरणानुसार चालकांना परतीचा माल मिळल्यावरच परत येता येत आहे.

- एखाद्या गावाला गेल्यावर त्या ठिकाणाहुन परतीचा माल नसेल तर कधी-कधी पुढे आजून संबंधित आगारातर्फे बाहेरगावी पाठवले जाते. अन्यथा त्याच आगारात माल मिळेपर्यंत दोन दिवस तर कधी चार दिवस मुक्काम करावा लागत आहे. यामुळे चालकांचा बाहेरगावी राहण्याचा खर्च वाढून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

- ट्रकवर चालक असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरगावी जातांना खर्चासाठी ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात केला जातो.

- संबंधित चालकाच्या मागणीनुसारच ॲडव्हान्स दिला जातो, अन्यथा दिला जात नाही.

- मालवाहतुकीच्या अंतरानुसार चालकांना ॲडव्हान्स दिला जातो. साधारणतः पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते.

- बाहेरगावी आगारातच राहण्याची व्यवस्था असली तरी, जेवणाची व्यवस्था चालकांना स्वतः करावी लागते. त्यात बाहेरगावी राहायचे म्हटल्यावर इतर खर्च वाढत असल्याने, दर महिन्याला तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी घेतलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

चालक म्हणतात..

१) पूर्वी माल पोहचवून सायंकाळी घराकडे परत येता येते. मात्र, महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी रिकामा ट्रक न आणता, माल घेऊनच बाहेरगावाहून येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, लगेचच माल मिळत नसल्याने आम्हाला चार ते पाच दिवस बाहेरगावी रहावे लागते. ऐन कोरोना काळात बाहेरगावी रहावे लागत असल्याने, महामंडळाचा हा निर्णय चुकीचा आहे.

एक चालक

उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या या नियमामुळे कर्मचारी मात्र कंगाल होत आहेत. मात्र, पोटासाठी सर्व त्रास सहन करावा लागतो. स्वतःच्या फायद्यासाठी पुढे-पुढे करणारे कामगार संघटनांचे प्रतिनिधी आता का गप्प आहेत, त्यांनी या धोरणा विरोधात आवाज उठवायला हवा होता.

एक चालक

माल वाहतुकीसाठी बाहेरगावी ट्रक घेऊन गेलेल्या चालकाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्याबाबतचा महामंडळाचा नियमच आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर व्यवस्थित नियोजन होत नसल्याने, चालकांना बाहेरगावी जास्त मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे चालकांचा हा त्रास थांबण्यासाठी महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल.

हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना