शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकीमुळे एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने ...

आर्थिक आर्थिक नुकसान : महामंडळाच्या धोरणाबद्दल चालकांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे प्रवासी सेवा बंद असल्याने, महामंडळाने माल वाहतुकीच्या उत्पन्नावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यांच्या लॉकडाऊन मध्ये मालवाहतूकीतून जळगाव विभागाला तब्बल १८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, एकीकडे मालवाहतुकीतून महामंडळ मालामाल होत असताना, दुसरीकडे बाहेरगावी ट्रक नेल्यानंतर, जो पर्यंत परतीचा माल मिळत नाही, तो पर्यंत या चालकांना चार ते पाच दिवस बाहेरगावी थांबावे लागत असल्याने, त्यांचा वैयक्तिक खर्च वाढला असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे मालवाहतूकीतून महामंडळ मालामाल आणि चालक मात्र कंगाल होत असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षापासून महामंडळाच्या प्रवासी सेवावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीची सेवा सुरू केली आहे. सुरुवातीपासून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जळगाव विभागाने एक कोटींहुन अधिक उत्पन्न मिळवले आहे. पूर्वी प्रमाणे चालकांना एका दिवसात घराकडे परत येता येत नसून, परतीचा माल मिळाल्यावरच घराकडे येण्याचे महामंडळाने काढले आहेत. त्यामुळे या चालकांना चार दिवस तर कधी आठ दिवसांपर्यंत बाहेरगावी रहावे लागत आहे. बाहेरगावी राहण्याचा ॲडव्हान्स महामंडळातर्फे देण्यात येत असला तरी, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्यामुळे चालकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

कोरोना काळात १८ लाखांची कमाई

- गेल्यावर्षा प्रमाणे यंदाही लॉकडाऊनमध्ये महामंडळाची मालवाहतुक सेवा यशस्वी ठरली आहे. गेल्या महिन्याभरात १८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

- महामंडळाकडून जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरात कुठेही माल पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे भाड्यापोटी सहजच एक लाखांच्या घरात उत्पन्न येत आहे

-या ट्रकद्वारे विविध व्यापारी व उद्योजकांचा कच्चा माल, सरकारी रेशनिंग माल, बी-बियाणे, किराणा माल आदी मालाची वाहतूक करून, त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे.

इन्फो :

परतीचा माल मिळेपर्यंत बाहेरगावीच मुक्काम

- पूर्वी संबंधित गावाला माल पोहचविल्यानंतर, चालकांना लागलीच ट्रक घेऊन पुन्हा जळगावकडे येता येत होते. मात्र, आता नव्या धोरणानुसार चालकांना परतीचा माल मिळल्यावरच परत येता येत आहे.

- एखाद्या गावाला गेल्यावर त्या ठिकाणाहुन परतीचा माल नसेल तर कधी-कधी पुढे आजून संबंधित आगारातर्फे बाहेरगावी पाठवले जाते. अन्यथा त्याच आगारात माल मिळेपर्यंत दोन दिवस तर कधी चार दिवस मुक्काम करावा लागत आहे. यामुळे चालकांचा बाहेरगावी राहण्याचा खर्च वाढून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

- ट्रकवर चालक असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरगावी जातांना खर्चासाठी ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, दिलेला ॲडव्हान्स पगारातून कपात केला जातो.

- संबंधित चालकाच्या मागणीनुसारच ॲडव्हान्स दिला जातो, अन्यथा दिला जात नाही.

- मालवाहतुकीच्या अंतरानुसार चालकांना ॲडव्हान्स दिला जातो. साधारणतः पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते.

- बाहेरगावी आगारातच राहण्याची व्यवस्था असली तरी, जेवणाची व्यवस्था चालकांना स्वतः करावी लागते. त्यात बाहेरगावी राहायचे म्हटल्यावर इतर खर्च वाढत असल्याने, दर महिन्याला तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी घेतलेला ॲडव्हान्स पगारातून कपात करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

चालक म्हणतात..

१) पूर्वी माल पोहचवून सायंकाळी घराकडे परत येता येते. मात्र, महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी रिकामा ट्रक न आणता, माल घेऊनच बाहेरगावाहून येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, लगेचच माल मिळत नसल्याने आम्हाला चार ते पाच दिवस बाहेरगावी रहावे लागते. ऐन कोरोना काळात बाहेरगावी रहावे लागत असल्याने, महामंडळाचा हा निर्णय चुकीचा आहे.

एक चालक

उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या या नियमामुळे कर्मचारी मात्र कंगाल होत आहेत. मात्र, पोटासाठी सर्व त्रास सहन करावा लागतो. स्वतःच्या फायद्यासाठी पुढे-पुढे करणारे कामगार संघटनांचे प्रतिनिधी आता का गप्प आहेत, त्यांनी या धोरणा विरोधात आवाज उठवायला हवा होता.

एक चालक

माल वाहतुकीसाठी बाहेरगावी ट्रक घेऊन गेलेल्या चालकाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्याबाबतचा महामंडळाचा नियमच आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर व्यवस्थित नियोजन होत नसल्याने, चालकांना बाहेरगावी जास्त मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे चालकांचा हा त्रास थांबण्यासाठी महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल.

हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना