शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दुष्काळामुळे कृषी महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:39 IST

जिल्हा प्रशासनाकडून कृषी आयुक्तांना पत्र

ठळक मुद्दे एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार

जळगाव : दुष्काळ परिस्थिती आणि त्यातच निवडणुकांची शक्यता असल्याने यंदाचा जानेवारी महिन्यात होणारा कृषी महोत्सव कृषी विभागाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचे पत्रच कृषी आयुक्तांना पाठवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी महोत्सव रद्द केला असला तरी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेणार असल्याचे सांगितले.कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या कृषी विभागाला मिळणाऱ्या निधीतून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भरविण्यात येतो. तर धान्य महोत्सव हा ‘आत्मा’च्या निधीतून एप्रिल महिन्यात भरविण्यात येत असतो. मात्र राज्य शासनाचा निधी हा मार्चअखेरपर्यंत खर्ची पडला पाहिजे, असे बंधनकारक असल्याने कृषी महोत्सव त्याआधीच घेणे भाग असते. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ज्वारी, बाजरी, तूर हे मार्चच्या पुढेच बाजारात येत असल्याने जानेवारी-फेब्रुवारीत कृषी महोत्सव घेऊन त्यात काय मांडायचे? असा प्रश्न असतो. त्यामुळे हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी एप्रिलमध्ये धान्य महोत्सव घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रत्यक्षात खरीपाचे धान्य दाखलप्रत्यक्षात मात्र खरीपाचे धान्य बाजारात दाखल झाले आहे. शासनाचेच भरडधान्य खरेदी केंद्र तसेच तूर, उडीद, मूग खरेदी केंद्रांवर देखील धान्य खरेदी सुरू आहे. खरीपाच्या उत्पन्नाचे आकडेवारी कृषी विभागाकडे जमा करणे सुरू आहे. त्यामुळे दुष्काळ असला तरी धान्याचे उत्पादनच झालेले नाही, अशी परिस्थिती नाही. तसेच धान्य जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाच बाजारात आले आहे. तरीही धान्य आलेले नसते, हा दावा कितपत खरा आहे? याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे. तर निवडणुकांची अडचण जानेवारी, फेब्रुवारीपेक्षा एप्रिलमध्येच अधिक येऊ शकते, अशी स्थिती आहे.तर कृषी तंत्रज्ञान मांडणे झाले असते शक्यशासनाकडून कृषी विभागाला शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क व्हावा यासोबतच यंत्रसामुग्री उत्पादक व शेतकरी यांच्यातही थेट संपर्क व्हावा, नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावे, हा देखील उद्देश ठेवून कृषी महोत्सव, धान्य महोत्सव यासारखे महोत्सव भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असते. त्यासाठी कृषी महोत्सवाकरीता तब्बल १५ ते १७ लाखांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र निधी उपलब्ध असतानाही केवळ कृषी विभागाने ‘नकारात्मक’ विचार केल्याने अथवा दृष्टीचा अभाव असल्याने हा महोत्सव रद्द केल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती