शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दुरांतोच्या अपघाताने जिल्हाभर प्रवासी खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:05 IST

सेवाग्राम नाशिकपर्यंतच : अनेक गाड्यांच्या मार्गात बदल, सुरतमार्गेही वाहतूक वळविली

ठळक मुद्देजळगाव रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दीलांब पल्ल्याच्या गाड्या भुसावळ, जळगाव, सुरत, वसईमार्गे मुंबईकडे सोडण्यात आल्याभुसावळ, मनमाड, नाशिक येथे हेल्पलाइन सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/भुसावळ/चाळीसगाव/ नंदुरबार : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-वाशिंद दरम्यान कसारा घाटात १२२९० अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी सकाळी ६.३३ वाजता झालेल्या अपघाताचा मोठा फटका खान्देशातील प्रवाशांनाही बसला आहे़मुंबईहून येणारी ५११५३ मुंबई-भुसावळ ही पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली. तसेच नऊ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. यामुळे जळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती़ भुसावळकडून मुंबईकडे जाणाºया रेल्वेगाड्या नंदुरबार मार्गाने वळवण्यात आल्या आहेत़ चाळीसगाव रेल्वेस्थानकात अनेकांना बस व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर काहींनी प्रवासच रद्द केला.या अपघातामुळे दिल्ली-मुंबई आणि नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, मुंबईहून निघणाºया अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या पुणे, दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक व पंजाब मेल इगतपुरीपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भुसावळसह मनमाड व नाशिक येथे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.याशिवाय दिल्ली, नागपूरकडून येणाºया अप मार्गावरील पुष्पक, गोदान, पाटलीपुत्र एक्स्प्रेस जळगाव, सुरत, वसईमार्गे मुंबई अशा सोडण्यात आल्या आहेत.दरम्यान, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, २२१३० अलाहाबाद-एलटीटी एक्स्पे्रस या गाड्यांना मनमाड, दौंड, पुणे यामार्गे सोडण्यात आले आहे.गाड्यांना विलंबअप आणि डाऊन मार्गावर धावणाºया सर्वच प्रवासी गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. असे असले तरी प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून भुसावळ रेल्वे प्रशासनाने ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले आहे.प्रवाशांना रेल्वे गाड्यांच्या धावण्याच्या वेळा कळाव्या म्हणून नियमितपणे रेल्वेस्थानकावर अनाऊन्स करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी दिली.लहान रेल्वेस्थानकांवरदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी बाहेरच्या हॉटेलचालकांना प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्रवासी हैराणलांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाºया प्रवाशांची गाड्या उशिरा व फेºयाने धावत असल्याने प्रचंड प्रमाणावर गैरसोय होत आहे.कामायनी रावेरला थांबून११०७२ अप कामायनी एक्स्प्रेस रावेर येथे बराच वेळ थांबून होती. तिचा मार्ग ठरल्यानंतर तिला पुढे जाऊ देण्यात येणार आहे.बस सज्जप्रवाशांनी मागणी केल्यास भुसावळहून मुंबईला जाण्यासाठी परिवहन मंडळाने दोन बस सज्ज करून ठेवल्या आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक हरीश भोई यांनी दिली. चालक-वाहकही तयार आहेत. प्रवाशांची संख्या वाढली म्हणजे तत्काळ बस सोडण्यात येईल.रिफंडसाठी अडचणीमार्ग बदलून व रद्द झालेल्या प्रवासी गाड्यांच्या तिकिटांचे पैसे मिळण्यास आरक्षण खिडकीवरून अडचणी येत असल्याची समस्या अनेक प्रवाशांनी मांडली.दरम्यान, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी मात्र प्रवाशांना रिफंड दिला जात आहे, कोणत्याही प्रवाशाची आपल्याकडे तक्रार आली नसल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.नंदुरबारहून ९ गाड्या मार्गस्थवसई-उधना-भेस्तान- नंदुरबार ते जळगाव यादरम्यान मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ एक्स्प्रेस ेगाड्या मार्गस्थ झाल्या होत्या़ तर कानपूर उद्योगनगरी, मुंबई-हावडा मेल व्हाया नागपूर, शालिमार एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, कोईमतूर-जबलपूर एक्स्प्रेस या गाड्या भुसावळकडून नंदुरबार मार्गाने सुरतकडे रवाना करण्यात आल्या आहेत़तूर्तास केवळ १४ गाड्यांना या मार्गावरून मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे़ मार्गावर होळजवळ किरकोळ स्वरूपाचे काम सुरू असल्याने गाड्यांची संख्या कमी आहे़ यात गाड्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़चाळीसगाव : नऊनंतर गाडीच नाहीरेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी ८.५५ वा. भुवनेश्वर एक्सप्रेस (१२८८० डाऊन) आली. नंतर मुंबई मार्गाची कोणतीही गाडी स्थानकात आली नाही. दुपारपर्यंत अनेक प्रवासी स्थानकात थांबून होते. गाड्याच नसल्याने दुपारनंतर पूर्णपणे शुकशुकाट पसरला.कुर्ला-वाराणसी (कामायनी), पुणे- भुसावळ हुतात्मा, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गोरखपूर-कुर्ला एक्स्प्रेस (काशी एक्स्प्रेस) व इतरही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना गाड्यांची माहिती व्हावी यासाठी फलकावर तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा केली जात होती, अशी माहिती स्टेशन मास्टर एन.पी.बडगुजर यांनी दिली.पाचोरा स्थानकावर भुसावळ पॅसेंजरचा तीन तास खोळंबापाचोरा स्थानकावर महानगरी एक्स्प्रेस सकाळी ८.४२ वा. आली व येथे थांबा नसतानाही ती येथे बराच वेळ थांबली व नंतर येथूनच या गाडीला माघारी फिरवून जळगाव-सुरतमार्गे मुंबईला रवाना केले.११.५० वाजता महानगरी तीन तास खोळंबा होऊन परत गेली, तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर सकाळी ९.२० वाजता आली व तीन तास स्थानकावर रोखून ठेवण्यात आली. अखेरीस साडेबारा वाजता देवळालीपर्यंत सोडण्यात आली.अन्य गाड्या जळगावहून सुरतमार्गे वळविण्यात आल्या. काही मनमाड-पुणेमार्गे रवाना करण्यात आल्या. काशी एक्स्प्रेसही जळगावहूनच सुरतमार्गे पाठविण्यात आली. पाचोरा स्थानकावर दोन गाड्या तीन तास थांबून होत्या.डीआरएमसह अधिकारी नियंत्रण कक्षात...भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांच्यासह वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक नरपतसिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सकाळपासृूनच डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात थांबून गाड्यांचे संचलन करीत होते.जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्रतीक्षालयात आराम करताना प्रवासी.