शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

लोकनियुक्त सरपंच निवड रद्दमुळे अनेकांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:11 IST

पुन्हा नव्याने तयारी । ग्रामीण भागात राजकारणाला नवे वळण

महिंदळे, ता.भडगाव : सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपणा?्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे ग्रामीण भागात वाहण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच निवड होणार म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली होती. परंतु लोकनियुक्त सरपंच निवड रद्द झाल्याने व सरपंच निवड सदस्यांमधून होईल हे जाहीर केल्याने लोकनियुक्त सरपंच निवडणूक लढवण्याचे अनेकांचे स्वप्न भंग झाले.आता वॉर्ड रचना आपल्या सोईनुसार कशी करता येईल यासाठी गावपुढारी तयारीला लागले आहेत. प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवड होत असल्याने उमेदवार विविध माध्यमांद्वारे समोर येत होते. परंतु या निर्णयामुळे आता नवीन रणनीती सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा भाऊबंधकीवर व आर्थिक बळावर निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. सदस्यांमधून सरपंच निवड झाल्यास ग्रामीण भागात कधीकधी पाच वर्षात पाच सरपंच होतात तर काहींना अविश्वासाला सामोरे जावे लागते.

मतदारांचा अपेक्षा भंगलोकनियुक्त सरपंच निवड होणार व निवडणूक चुरशीची होणार या उत्साहात मतदार आपापल्या परीने आपला उमेदवार लोकनियुक्त सरपंचसाठी कसा योग्य आहे हे पटवून देताना दिसत होते. परंतु सरकारच्या लोकनियुक्त सरपंच निवड रद्दच्या निर्णयामुळे मतदारांचा अपेक्षा भंग झाला.