शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

पीककर्ज वाटपाला दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:54 IST

रब्बीतही जेमतेम १८ टक्के कर्जवाटप

ठळक मुद्दे२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट

जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा जळगाव जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र घटले असून त्यामुळेच रब्बीच्या पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला आहे. २५६ कोटींच्या रब्बी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना आतापर्यंत केवळ ४७५१ शेतकऱ्यांना ४६ कोटी ४ लाखांचे रब्बी पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा फारच कमी हजेरी लावली. जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यातील बहुतांश मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाने ताण दिल्याने खरीपाचा हंगाम हातचा गेला आहे. जी पिके तगली, त्यांच्याही उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट आली असल्याचे चित्र आहे. धरणेजलाशयांमध्ये पाणीसाठा नसल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नसल्याने यंदा रब्बीचा हंगामही संकटात सापडला.जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र १ लाख ५२ हजार हेक्टर आहे. रब्बीच्या पिकांची लागवड करूनही त्यांना पाणी पुरेल याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकºयांनी पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक शेतकºयांकडे विहिरीला पुरेसे पाणीच नसल्याने त्यांनाही रब्बीची पेरणी करता आली नाही. त्यातच जिल्हा प्रशासनानेही चारा टंचाई भासू नये यासाठी ज्या शेतकºयांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांना रब्बीच्या पिकांची लागवड न करता चाºयाची लागवड घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदा जेमतेम ३५ ते ४० हजार हेक्टरपर्यंतच पेरणी होणार असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली आहे.२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्टयंदा रब्बी पीककर्ज वाटपाचे एकूण २५६ कोटींचे उद्दीष्ट जिल्हा बँकेसह सर्व व्यापारी बँकांना देण्यात आले होते. मात्र त्यापैकी आतापर्यंत राष्टÑीयकृत बँकांनी जेमतेम १३ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर राष्टÑीयकृत बँकांसह खाजगी व ग्रामीण बँका मिळून एकूण २३ टक्के रब्बी कर्जवाटप केले आहे. तर जिल्हा बँकेने १० टक्के पीककर्ज वाटप केले आहे. एकूण सुमारे ४६ कोटींचे रब्बी पीककर्ज वाटप झाले आहे.खरीप पीककर्ज वाटपातही आखडता हातसर्वच बँकांनी खरीप पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला होता. खरीपाचे २९४४ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट असताना ३० सप्टेंबर अखेर मुदत संपली तोपर्यंत केवळ १७९४ कोटी म्हणजे ३५ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती