शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

पीककर्ज वाटपाला दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:54 IST

रब्बीतही जेमतेम १८ टक्के कर्जवाटप

ठळक मुद्दे२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट

जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा जळगाव जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र घटले असून त्यामुळेच रब्बीच्या पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला आहे. २५६ कोटींच्या रब्बी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना आतापर्यंत केवळ ४७५१ शेतकऱ्यांना ४६ कोटी ४ लाखांचे रब्बी पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा फारच कमी हजेरी लावली. जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यातील बहुतांश मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाने ताण दिल्याने खरीपाचा हंगाम हातचा गेला आहे. जी पिके तगली, त्यांच्याही उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट आली असल्याचे चित्र आहे. धरणेजलाशयांमध्ये पाणीसाठा नसल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नसल्याने यंदा रब्बीचा हंगामही संकटात सापडला.जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र १ लाख ५२ हजार हेक्टर आहे. रब्बीच्या पिकांची लागवड करूनही त्यांना पाणी पुरेल याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकºयांनी पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक शेतकºयांकडे विहिरीला पुरेसे पाणीच नसल्याने त्यांनाही रब्बीची पेरणी करता आली नाही. त्यातच जिल्हा प्रशासनानेही चारा टंचाई भासू नये यासाठी ज्या शेतकºयांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांना रब्बीच्या पिकांची लागवड न करता चाºयाची लागवड घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदा जेमतेम ३५ ते ४० हजार हेक्टरपर्यंतच पेरणी होणार असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली आहे.२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्टयंदा रब्बी पीककर्ज वाटपाचे एकूण २५६ कोटींचे उद्दीष्ट जिल्हा बँकेसह सर्व व्यापारी बँकांना देण्यात आले होते. मात्र त्यापैकी आतापर्यंत राष्टÑीयकृत बँकांनी जेमतेम १३ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर राष्टÑीयकृत बँकांसह खाजगी व ग्रामीण बँका मिळून एकूण २३ टक्के रब्बी कर्जवाटप केले आहे. तर जिल्हा बँकेने १० टक्के पीककर्ज वाटप केले आहे. एकूण सुमारे ४६ कोटींचे रब्बी पीककर्ज वाटप झाले आहे.खरीप पीककर्ज वाटपातही आखडता हातसर्वच बँकांनी खरीप पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला होता. खरीपाचे २९४४ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट असताना ३० सप्टेंबर अखेर मुदत संपली तोपर्यंत केवळ १७९४ कोटी म्हणजे ३५ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती