शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पॅसेंजर रद्द केल्याने बसेसवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 15:59 IST

ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे.

ठळक मुद्देकजगावसह परिसरातील ४० खेड्यातील नागरिकांचे हालमहिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हालप्रवासी चढउतारमध्येही वाद

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे. यात व्यापारी, नोकरीसाठी ये-जा करणारे नोकरवर्ग, शिक्षणासाठी जा-ये करणारे विद्यार्थी, कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त जळगाव येथे जाणारे यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वेची गर्दी एस बसकडे वळल्याने बसेसमध्ये तासनतास नंबर लागत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यात लहान मुले, वृद्ध व महिला यांना तर विनाप्रवास परत घरी जाण्याची वेळ येत आहे.१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दीड महिन्यासाठी भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ, देवळाली-भुसावळ, भुसावळ-देवळाली या चारही पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. लग्नसराई, परीक्षा काळातच या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबरोबरच वेळदेखील वाया जात आहे. कारण कजगाव हे परिसरातील ४० खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. ४० खेड्यातील प्रवाशांची ये-जा कजगाव येथून याच पॅसेंजरने असते. खिशाला परवडेल अशा भाड्यात आरामदायी प्रवास होतो. मात्र याच पॅसेंजर चक्क दिड महिन्यासाठी बंद केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांची गर्दी एसटी बसकडे वाढली आहे. परिणामी बसेस हाऊस फुल्ल चालत असल्याने बसेसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात वयस्कर महिला, पुरुष व लहान बालकांचे मोठे हाल होत आहेत. प्रवासी चढउतारमध्येही वाद होत आहेत. 

टॅग्स :Bus DriverबसचालकBhadgaon भडगाव