शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

जळगावत भिंत पाडल्याने रेल्वे स्टेशन रस्त्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:04 IST

आता गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे स्टेशनर्पयत जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 23 - रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे स्थानकानजीकची भिंत पाडण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर शनिवारी यश मिळाले. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दुपारी ही भिंत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे आता गोविंदा रिक्षा स्टॉप ते रेल्वे स्टेशनर्पयत जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किगजवळील आणि खान्देश सेंट्रल मॉलच्या हद्दीत असलेली भिंत तोडून हा रस्ता मोकळा करण्याचा विषय गेले अनेक महिने प्रलंबित होता. या संदर्भात यापूर्वी दोन वेळा जिल्हाधिका:यांनी पाहणीदेखील केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने भिंत पाडण्याचे काम बरेच दिवस रखडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी दुपारी खासदार ए. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिका:यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये सवार्नुमते ही भिंत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर ,भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव, भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक सुरक्षा आयुक्त सुरेश चंद्र, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, शहर वाहतूक शाखेचे सतीश भामरे, सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक नगररचनाकार भास्कर भोळे, शहर अभियंता सुनील भोळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित यावेळी होते. रेल्वे पोलीस चौकीजवळ नो-पार्किग झोन करण्यात येणार असून त्याठिकाणी प्रवाशांना उतरवून त्यानंतर वाहने ही खान्देश सेंट्रल मॉलच्या खुल्या जागेत पाकिर्ंगच्या ठिकाणी लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. खान्देश सेंट्रल मॉलच्या खुल्या जागेत वाहने पार्किंग करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन व महानगरपालिका हे खान्देश सेंट्रल मॉलच्या प्रशासनाशी चर्चा करून परवानगी घेणार आहेत. त्यानंतर 24 मीटरचा रस्ता जाण्या-येण्याच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.भिंत तोडून रस्त्याचा वापर सुरू करणे, शहर आणि परिसरातील तीन उड्डाणपुलांचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सवार्नुमते घेऊन त्याची लगेच अंमलबजावणी करीत खासदार ए. टी. पाटील आणि जिल्हा प्रशासनाने शनिवारी उपस्थितांना धक्का दिला. सध्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी जो मार्ग आहे तेथे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यात प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. ही भिंत पाडल्यामुळे गोविंदा रिक्षा स्टॉपपासून सुरू होणारा 24 मीटर रुंदीचा हा रस्ता वापरण्यास खुला झाल्यावर सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण, कोंडी आणि अन्य समस्या टळण्यास मदत होणार आहे.भिंत पाडण्यापूर्वी खासदार ए. टी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली त्या वेळी त्यांनी रेल्वे अधिका:यांना काम करण्याबाबत नेमकी काय अडचण आहे? अशी विचारणा करीत अधिकारी ए.सी. मध्ये बसतात, जनता आम्हाला विचारते, खासदार काय करतात ? हे मी स्वत:साठी नव्हे, तर जनतेसाठी करीत आहे, अशी रेल्वेच्या अधिका:यांना तंबी दिली. कोणाशी बोलायचे असेल तर ते सांगा? रेल्वे मंत्र्याशीही बोलतो, आजच काय ते करायचे ते करू असे म्हणत थेट जागेवरच जाण्याचे ठरविले व त्यानंतर लागलीच भिंत पाडण्यात आली.