शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

चालक-वाहकांची रात्र डासांसोबत एसटीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST

जळगाव : ग्रामीण भागातील प्रवाशांना, विद्यार्थांना व इतर चाकर मान्यांना शहरात येण्यासाठी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील दूरवरच्या गावांमध्ये रात्री मुक्कामी ...

जळगाव : ग्रामीण भागातील प्रवाशांना, विद्यार्थांना व इतर चाकर मान्यांना शहरात येण्यासाठी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील दूरवरच्या गावांमध्ये रात्री मुक्कामी बसेस पाठविल्या जातात. बसवरील चालक-वाहकांना संबंधित गावाने ग्रामपंचायतीत रात्री झोपण्याची व्यवस्था केली तर ठीक, अन्यथा बहुतांश चालक-वाहकांना रात्री बसमध्येच झोपावे लागत आहे. मात्र, रात्रभर या चालकांना प्रचंड डासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे जळगाव आगारातून विविध ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या काही चालक-वाहकांनी सांगितले.

जळगाव आगारातून सध्या ग्रामीण व शहरी भाग मिळून ३० ते ३५ बसेस बाहरगावी रात्री मुक्कामाला असतात. प्रत्येक बसवर चालक व वाहक या प्रमाणे ६० ते ७० कर्मचारी रात्री विविध गावांमध्ये मुक्कामी असतात. यामध्ये मुंबई, पुणे, उधना, सुरत, सेल्वासा या लांब अंतरावरच्या बसेस मुक्कामासाठी सकाळी निघतात. तर ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सायंकाळी निघतात. सकाळी पुन्हा या बसेस प्रवाशांना घेऊन जळगाव आगारात येतात.

मात्र, या बसेसवर मुक्कामासाठी जाणाऱ्या चालक-वाहकांना रात्री मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामंडळातर्फे कुठेही झोपण्याची व्यवस्था नसल्यामुळे बसमध्येच झोपावे लागते. डास चावत असल्यामुळे कर्मचारी मच्छर दाणी घेउन जातात. तर काही कर्मचारी गावातील ग्रामपंचायतीच्या किंवा शाळेच्या ओट्यावर मच्छरदाणी लावून झोपतात. यामध्ये पावसाळ्यात तर खुप हाल होत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

इन्फो :

रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस

४०

मुक्कामी थांबावे लागतात

असे वाहक

४०

चालक

४०

गावात सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे गैरसोय

- ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या काही चालक-वाहकांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालये नाहीत. तर ज्या गावांमध्ये आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. तर शौचालयांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे रात्री उघड्यावर जावे लागत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

- तर पुणे, मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या वाहकांनी सांगितले की, या मोठ्या शहरांमध्ये आगारातच रात्री मुक्कामाला बस थांबते. तेथील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र असलेल्या विश्रांती गृहात मुक्कामाला थांबत असतो. या ठिकाणी बऱ्यापैकी सुविधा असतात. त्यामुळे फारसी गैरसोय होत नसल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

कोरोनामुळे लवकर मदत मिळेना

- सध्या कोरोनामुळे बाहेरगावी मुक्कामी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुक्कामी जातांना या कर्मचाऱ्यांकडे रात्रीची शिदोरी व पाणी सोबत असले तरी, रात्रीच्या वेळेला पिण्याच्या पाण्याची गरज पडली, तर नागरिक कोरोनाच्या भितीने लवकर पाणी देत नसल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक सहकार्याची भावना न ठेवता, मदतीपासून दुर पळत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, असे असले तरी आम्ही या गोष्टींचा विचार न करता, आमच्याकडे सर्व प्रकारची शिदोरी ठेवून, आमचे कर्तव्य चोखपणे पार पडत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

बाहेरगावी मुक्कासाठी गेल्यावर काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून राहण्याची सुविधा केली जाते. त्यामुळे रात्री फारसा त्रास जाणवत नाही. जर कुठल्या गावामध्ये व्यवस्था नसली, तर बसमध्येच डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी लावून झोपून राहतो.

एक चालक,

इन्फो :

ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीकडून झोपण्याची व्यवस्था केली असली, तर थोडाफार त्रास सहन करावा लागतोच. अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचायलही नसल्यामुळे उघड्यावरच जावे लागते. गावात रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यावर, बसच्या टपावरच झोपावे लागते. ड्युटी असल्यामुळे डासांमध्ये झोपण्याची सवयच झाली आहे.

एक वाहक

इन्फो :

दोन वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश गावांमध्ये तेथील ग्रामपंचायतींनी चालक-वाहकांची रात्री झोपण्याची चांगली व्यवस्था केलेली दिसून आली. त्यामुळे कुठेही रात्री मुक्कामी कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले नाही. पूर्वीच्या पेक्षा आता ग्रामीण भागात खुप चांगल्या सुविधा मिळत आहेत.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार