शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

चिखलमय रस्त्यामुळे औरंगाबाद महामार्गावर वाहनधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:14 IST

गेल्या वर्षभरापासून सुरु आहे काम : मार्ग बनला धोकादायक, अपघातांच्या प्रमाणात वाढ

वाकोद, ता.जामनेर :औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु असून त्यात हा रस्ता दुतर्फा खोदुन ठेवल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर या मार्गावरील वाहतूकही अत्यंत धोकादायकही झाली आहे. याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खोदून ठेवलेल्या या रस्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहन चालविणे मोठे जिकरीचे बनले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोऱ्या बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खोदून ठेवला असून वाहतुकीसाठी कच्चा रस्ता केला आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावरून दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ सुरू असते. हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्याने व नेहमीच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर वाहनांची गती थोडी कमी असतानाही लहान मोठ्या अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.नेहमी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असते. सध्या असलेल्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ ते २० फुटांपर्यंत मुरूम व माती टाकून वाढीव रस्त्याचे काम करण्यात आले आहे.रस्त्यावर मुरुम व माती मोठ्या प्रमाणात असल्याने पाऊस असल्यास चिखल होतो व नसल्यास सतत धुळ उडत असते. यामुळे शेतातील पिके खराब होऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरे सुतक सबंधित ठेकेदाराला किंवा लोकप्रतिनिधीना नसल्याचे दिसत आहे.वाहनांची बैलगाडी पेक्षाही वाईट स्थितीगेल्या अनेक महिन्यापासून औरंगाबाद महामार्ग हा संबंधित ठेकेदार यांनी खोदून ठेवलेला आहे. मोठ मोठे खड्डे तसेच वर -खाली रस्ते यामुळे चांगल्या वाहनातही बैलगाडी पेक्षाही प्रचंड दणके वाहनधारकांना बसत आहेत. या रस्त्यावर गाडी चालवणे मोठे जिकरीचे बनले असून वाहनांचे मोठे नुकसान होत आह. यामुळे वाहन धारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर प्रवासाचा वेळही खूपच वाढत आहे. तरी एक बाजू का होईना वाहनधारकांसाठी तयार करण्यात यावी व रहदारी सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.करावा लागतोय अडचणींचा सामनाजळगाव- औरंगाबाद महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी- विदेशी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तसेच औरंगाबाद येथे विमानतळ, हायकोर्ट तसेच पर्यटन स्थळे असल्याने या रस्त्यावर चांगलीच वर्दळ असते.पिंपळगाव-वडगाव रस्त्याने वाढली वर्दळपहुर ते वाकोद दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने जळगाव -औरंगबाद प्रवास करणारे सध्या वाकोद वडगाव-पिंपळगाव मार्गे पहूर असा प्रवास करीत आहेत. शनिवार पासून सलग तीन दिवसापासून पाऊस सुरू असून सोमवार रोजी पहुर- वाकोद रस्त्यावर चिखलामध्ये गाडी अडकल्याने दुतर्फा वाहतुक खोळबंली होती. यामुळे वडगावमार्गे वाहनांची मोठी वर्दळ वाढलेली होती.