शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट सेवेसाठी पंधरा दिवसाच्या नियमाला चालक-वाहकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

एस. टी.महामंडळ : कामगार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड ...

एस. टी.महामंडळ : कामगार संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनाने आता जळगाव येथून मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजाविण्याचे आदेश दिले आहेत. महामंडळाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत असून, परिणामी कामगार संघटनांनी या निर्णया विरोधात आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शविली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मुंबईतील लोकल सेवा बंद होत्या. त्यामुळे बेस्टतर्फे नागरिकांना वाहतुकीची सेवा देण्यात आली. तसेच या सेवेसाठी मुंबईतील चालक-वाहक अपुरे पडत असल्यामुळे जळगावसह राज्यभरातील विविध आगारातून चालक-वाहक मुंबईला सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. सध्या लोकल सेवा सुरू झाली असली तरी, महामंडळातर्फे या कर्मचाऱ्यांना सेवा बजाविण्यासाठी बोलविलेच जात आहे. आता महामंडळाने आठ दिवसांऐवजी पंधरा दिवस बेस्टच्या सेवेसाठी मुंबईला येण्याचे आदेश काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव विभागातून दर आठवड्याला ५० चालक व ५० वाहक मुंबईला सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. मुंबईहून जळगावला आल्यानंतर अनेक चालक-वाहकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे सुरुवाती पासूनच बेस्ट सेवेसाठी जाण्याला कर्मचाऱ्यांमधून विरोध होत आहे. त्यात आता महामंडळाने आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजावण्याचे आदेश काढल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून या सेवेला जाण्यासाठी विरोध दर्शविण्यात येत आहे.

इन्फो

मुंबईला जाऊनही भत्ता मिळत नाही

मुंबईला राहण्याची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येत असून, फक्त जेवणासाठी २५० रुपये भत्ता देण्यात येत आहे. मात्र, ना जादा वेतन ना इतर कुठलेही लाभ देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून सुरुवातीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

जळगाव विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जाऊन आल्यावर देखील, परत जळगाव विभागाला मुंबईला कामगिरीसाठी बोलावून अन्याय केला आहे. आता तर ८ दिवस ऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा संघटनेतर्फे महामंडळा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना, जळगाव विभाग

सध्या महामंडळातर्फे बेस्टच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांना एक आठवडाच मुंबई येथे पाठविण्यात येत आहे. पंधरा दिवस पाठविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल.

-श्रावण सोनवणे, प्रभारी विभाग नियंत्रक, जळगाव विभाग