शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

वाहन जपून चालवा; महामार्ग ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

जळगाव : जळगावकरांनो, महामार्गावरुन वाहन चालविताहेत..तर मग सावधान..शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग धोकेदायक व जीवघेणा ठरत चालला आहे. ...

जळगाव : जळगावकरांनो, महामार्गावरुन वाहन चालविताहेत..तर मग सावधान..शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग धोकेदायक व जीवघेणा ठरत चालला आहे. या महामार्गाने अनेक बळी घेतले आहेत. तरुण मुले, नोकरदार, महिला या अपघातात ठार झालेल्या आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्ती या महामार्गाने कायमच्या नेलेल्या आहेत. याच महामार्गावर शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन तर धुळे-चाळीसगाव महामार्गावर चिंचखेड फाटा १ असे तीन ब्लॅक स्पॉट अनेक वर्षापासून जाहिर झालेले आहेत.

खरे तर पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अनेक अपघात झाले असून त्यात निष्पाप वाहनधारकांचे जीव गेलेले आहेत तर काहींचे अवयव कायमचे निकामी झालेले आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात ७२१ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा बळी गेलेला आहे. ३७७ जण किरकोळ तर १९१ जण गंभीर जखमी झालेले आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावरच झालेले आहेत. धरणगाव तालुक्यातील एकलग्न, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा व पारोळा या ठिकाणी देखील अपघातांचे व जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे, मात्र ते अद्यापही ब्लॅक स्पॉट जाहिर झालेले नाहीत. रस्त्यावरील साधारण ५०० मीटरचे अंतर जेथे मागील तीन वर्षात ५ रस्ते अपघात झालेले आहेत (ज्यात व्यक्ती जखमी अथ‌वा मृत झालेले आहेत.) तसेच जेथे मागील ३ वर्षात रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, ही ब्लॅक स्पॉटची व्याख्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने निश्चित केलेली आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट : ३

२०२० मध्ये झालेले अपघात :७२१

अपघातातील मृत्यू : ४७१

मागील वर्षी अपघातांची संख्या

जानेवारी :६७

फेब्रुवारी :६४

मार्च : ५१

एप्रिल : २२

मे : ५०

जून : ५९

जुलै : ५७

ऑगस्ट :६३

सप्टेबर : ५८

ऑक्टोबर :६७

नोव्हेंबर : ७८

डिसेंबर : ८५

पाळधी ते नशिराबाद वाहन जपून चालवा

राष्ट्रीय महामार्ग सहा अत्यंत घातक ठरत असून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अपघातांची संख्या जास्त असून शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन ठिकाणे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. दोन महिन्यापूर्वीच अजिंठा चौक ते इच्छा देवी चौक या दरम्यान दोन अपघात झाले असून त्यात दोघांचा जीव गेलेला आहे.

असे आहेत ब्लॅक स्पॉट

जळगाव : २

चाळीसगाव : १

राष्ट्रीय महामार्ग ६ वर सर्वाधिक बळी

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरच सर्वाधिक अपघात व बळी गेलेले आहेत. साधारण पारोळा ते भुसावळ हे अंतर अत्यंत घातक आहे. त्यातल्या त्यात बांभोरी ते नशिराबाद दरम्यान जास्त बळी गेलेले आहेत.