शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

वाहन जपून चालवा; महामार्ग ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

जळगाव : जळगावकरांनो, महामार्गावरुन वाहन चालविताहेत..तर मग सावधान..शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग धोकेदायक व जीवघेणा ठरत चालला आहे. ...

जळगाव : जळगावकरांनो, महामार्गावरुन वाहन चालविताहेत..तर मग सावधान..शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग धोकेदायक व जीवघेणा ठरत चालला आहे. या महामार्गाने अनेक बळी घेतले आहेत. तरुण मुले, नोकरदार, महिला या अपघातात ठार झालेल्या आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्ती या महामार्गाने कायमच्या नेलेल्या आहेत. याच महामार्गावर शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन तर धुळे-चाळीसगाव महामार्गावर चिंचखेड फाटा १ असे तीन ब्लॅक स्पॉट अनेक वर्षापासून जाहिर झालेले आहेत.

खरे तर पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अनेक अपघात झाले असून त्यात निष्पाप वाहनधारकांचे जीव गेलेले आहेत तर काहींचे अवयव कायमचे निकामी झालेले आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात ७२१ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा बळी गेलेला आहे. ३७७ जण किरकोळ तर १९१ जण गंभीर जखमी झालेले आहेत. सर्वाधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावरच झालेले आहेत. धरणगाव तालुक्यातील एकलग्न, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा व पारोळा या ठिकाणी देखील अपघातांचे व जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे, मात्र ते अद्यापही ब्लॅक स्पॉट जाहिर झालेले नाहीत. रस्त्यावरील साधारण ५०० मीटरचे अंतर जेथे मागील तीन वर्षात ५ रस्ते अपघात झालेले आहेत (ज्यात व्यक्ती जखमी अथ‌वा मृत झालेले आहेत.) तसेच जेथे मागील ३ वर्षात रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, ही ब्लॅक स्पॉटची व्याख्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने निश्चित केलेली आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट : ३

२०२० मध्ये झालेले अपघात :७२१

अपघातातील मृत्यू : ४७१

मागील वर्षी अपघातांची संख्या

जानेवारी :६७

फेब्रुवारी :६४

मार्च : ५१

एप्रिल : २२

मे : ५०

जून : ५९

जुलै : ५७

ऑगस्ट :६३

सप्टेबर : ५८

ऑक्टोबर :६७

नोव्हेंबर : ७८

डिसेंबर : ८५

पाळधी ते नशिराबाद वाहन जपून चालवा

राष्ट्रीय महामार्ग सहा अत्यंत घातक ठरत असून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान अपघातांची संख्या जास्त असून शिवकॉलनी व तरसोद फाटा हे दोन ठिकाणे ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. दोन महिन्यापूर्वीच अजिंठा चौक ते इच्छा देवी चौक या दरम्यान दोन अपघात झाले असून त्यात दोघांचा जीव गेलेला आहे.

असे आहेत ब्लॅक स्पॉट

जळगाव : २

चाळीसगाव : १

राष्ट्रीय महामार्ग ६ वर सर्वाधिक बळी

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरच सर्वाधिक अपघात व बळी गेलेले आहेत. साधारण पारोळा ते भुसावळ हे अंतर अत्यंत घातक आहे. त्यातल्या त्यात बांभोरी ते नशिराबाद दरम्यान जास्त बळी गेलेले आहेत.