शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

रावेर परिसरात पाच फूट अंतरावर ड्रिपर नळ्यांची होतेय जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:59 IST

केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेºहाळे परिसरात पाण्याचा वनवाउन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा घेणे झाले अवघडपिकांपेक्षा जमिनीलाच जास्त पाणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या भागात नैसर्गिक देश असलेला हरित पट्टा भूगर्भातील पाणी व मेहनतीच्या बळावर बागायती पिकांमध्ये केळीसाठी उत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे भूगर्भातील पाण्याअभावी परिसर भकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही.पिकांना पाण्याचे नियोजन व अत्यल्प पाणी वापरून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्याकरिता ईस्त्राईलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात वरदान ठरले. सुरूवातीला झालेले ठिबक तंत्रज्ञानाद्वारे वापरण्यात येणाऱ्या नळीमध्ये पिकांना पाणी टाकणारे ड्रिपर पाच फुटांच्या अंतरावर असायचे व ते लाभदायकसुद्धा होते. कारण केळी पिकांची लागवड पाच बाय साडेपाच फूट या अंतरावर असते. त्यामुळे नेमके नळीतून पाणी लागवड केलेल्या खोडाजवळच पडायचे. जमिनीवर इतरत्र पडत नसल्यामुळे नळींमधून येणारा पाण्याचा दाब जास्त मिळायचा. परंतु कालांतराने बदलत्या पिकांसाठी उदा.मका, हरभरा, गहू, ऊस यांच्याकरिता सव्वा ते दीड फूट अंतरावर ड्रिपर असणाºया नळ्या कंपन्यांची बाजारात आणल्या व पाच फुटांवरील ड्रिपर हद्दपार झाले. मात्र केळीसाठी उपयुक्त व पाण्याच्या नियोजनासाठी पाच फुटावरील ड्रिपर असलेली नळीच महत्वाची आहे, अशी जाणीव शेतकºयांना होऊ लागली आहे.कारण पाच फूट अंतराच्यामध्ये सव्वा फूट ड्रिपर नळी असल्यास दोन ड्रिपरांचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी पिकांएवजी फक्त जमिनीलाच जास्त मिळत असते. त्यामुळे पाण्याचा टंचाईमध्ये केळीसाठी पाच फुट अंतरावरील ड्रिपरच शेतकºयांना काही प्रमाणात तारण्यात यशस्वी ठरेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदा येणारा उन्हाळा हिवाळ्यातच पाण्याचा वनवा घेऊन आला आहे. यामुळे उन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा पूर्णपणे हाती येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर