शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रावेर परिसरात पाच फूट अंतरावर ड्रिपर नळ्यांची होतेय जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:59 IST

केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेºहाळे परिसरात पाण्याचा वनवाउन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा घेणे झाले अवघडपिकांपेक्षा जमिनीलाच जास्त पाणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या भागात नैसर्गिक देश असलेला हरित पट्टा भूगर्भातील पाणी व मेहनतीच्या बळावर बागायती पिकांमध्ये केळीसाठी उत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे भूगर्भातील पाण्याअभावी परिसर भकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही.पिकांना पाण्याचे नियोजन व अत्यल्प पाणी वापरून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्याकरिता ईस्त्राईलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात वरदान ठरले. सुरूवातीला झालेले ठिबक तंत्रज्ञानाद्वारे वापरण्यात येणाऱ्या नळीमध्ये पिकांना पाणी टाकणारे ड्रिपर पाच फुटांच्या अंतरावर असायचे व ते लाभदायकसुद्धा होते. कारण केळी पिकांची लागवड पाच बाय साडेपाच फूट या अंतरावर असते. त्यामुळे नेमके नळीतून पाणी लागवड केलेल्या खोडाजवळच पडायचे. जमिनीवर इतरत्र पडत नसल्यामुळे नळींमधून येणारा पाण्याचा दाब जास्त मिळायचा. परंतु कालांतराने बदलत्या पिकांसाठी उदा.मका, हरभरा, गहू, ऊस यांच्याकरिता सव्वा ते दीड फूट अंतरावर ड्रिपर असणाºया नळ्या कंपन्यांची बाजारात आणल्या व पाच फुटांवरील ड्रिपर हद्दपार झाले. मात्र केळीसाठी उपयुक्त व पाण्याच्या नियोजनासाठी पाच फुटावरील ड्रिपर असलेली नळीच महत्वाची आहे, अशी जाणीव शेतकºयांना होऊ लागली आहे.कारण पाच फूट अंतराच्यामध्ये सव्वा फूट ड्रिपर नळी असल्यास दोन ड्रिपरांचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी पिकांएवजी फक्त जमिनीलाच जास्त मिळत असते. त्यामुळे पाण्याचा टंचाईमध्ये केळीसाठी पाच फुट अंतरावरील ड्रिपरच शेतकºयांना काही प्रमाणात तारण्यात यशस्वी ठरेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदा येणारा उन्हाळा हिवाळ्यातच पाण्याचा वनवा घेऊन आला आहे. यामुळे उन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा पूर्णपणे हाती येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर