शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या ...

खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या नगरमध्ये नागरी वस्ती वाढली. मात्र, इतक्या वर्षांत रस्ते, गटारी तर सोडा, साधी पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटली नसल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी अनेकवेळा मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्याने उन्हाळ्यात आता पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत येथील रहिवाशांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.

शहराला लागून असलेल्या खुबचंद साहित्या नगरमध्ये मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. शहरापासून दूर,नैसर्गीक आणि प्रदूषणमुक्त हा भाग असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस या भागात रहिवास वाढत आहे. मात्र, आज ना उद्या समस्या सुटतील, या आशेने या भागातील नागरी वस्ती वाढतच आहे; परंतु दहा वर्षांपासून पाणी, रस्ते आणि गटारींची समस्या आजही ‘जैसे थे’ आहे. नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी वापरावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल नाही, त्या नागरिकांना बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. वर्षानुवर्षं अशा प्रकारचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलच्या पाण्याचा साठा कमी होतो. यामुळे पिण्याचे पाणीही मिळेनासे होते. त्यामुळे जारने बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत असल्याचेही या भागातील रहिवाशांनी सांगितले. तसेच या ठिकाणी रस्ते आणि गटारी नसल्याने पावसाळ्यात खूपच हाल होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

लोकप्रतिनिधी आश्वासन देऊन वेळ मारून नेतात

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पुढारी या भागात आले. त्यांना येथील समस्यांबाबत अनेक वेळा सांगितले, त्यांनी निवडणुका झाल्यानंतर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी करतो करतो, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची खंतही या नागरिकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी रस्ते व गटारींची समस्या सोडवली नाही तरी चालेल. मात्र, पाण्याची समस्या लवकर सोडविण्याची अपेक्षाही या नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, ना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली ना रस्ते, गटारींची. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने जार विकत आणून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.

राजेंद्र पाटील, रहिवासी

पाण्याच्या समस्येबाबत जळगाव मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. रहिवाशांना यामुळे बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचेही पाणी कमी होत असल्याने आम्हा रहिवाशांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे.

चंद्रकांत मोरे,रहिवासी

पाणीटंचाईचा सर्वात मोठा महिलांना करावा लागतो. घरात पाणी नसल्याने इतर कामेही अडून पडतात. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईच्या समस्येचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सुमन राठोड, रहिवासी

या भागात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याशिवाय दुसरी व्यवस्था नाही. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.

कलाबाई पाटील, रहिवासी