शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या ...

खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या नगरमध्ये नागरी वस्ती वाढली. मात्र, इतक्या वर्षांत रस्ते, गटारी तर सोडा, साधी पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटली नसल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी अनेकवेळा मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्याने उन्हाळ्यात आता पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत येथील रहिवाशांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.

शहराला लागून असलेल्या खुबचंद साहित्या नगरमध्ये मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. शहरापासून दूर,नैसर्गीक आणि प्रदूषणमुक्त हा भाग असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस या भागात रहिवास वाढत आहे. मात्र, आज ना उद्या समस्या सुटतील, या आशेने या भागातील नागरी वस्ती वाढतच आहे; परंतु दहा वर्षांपासून पाणी, रस्ते आणि गटारींची समस्या आजही ‘जैसे थे’ आहे. नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी वापरावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल नाही, त्या नागरिकांना बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. वर्षानुवर्षं अशा प्रकारचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलच्या पाण्याचा साठा कमी होतो. यामुळे पिण्याचे पाणीही मिळेनासे होते. त्यामुळे जारने बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत असल्याचेही या भागातील रहिवाशांनी सांगितले. तसेच या ठिकाणी रस्ते आणि गटारी नसल्याने पावसाळ्यात खूपच हाल होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इन्फो :

लोकप्रतिनिधी आश्वासन देऊन वेळ मारून नेतात

या भागातील रहिवाशांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पुढारी या भागात आले. त्यांना येथील समस्यांबाबत अनेक वेळा सांगितले, त्यांनी निवडणुका झाल्यानंतर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी करतो करतो, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची खंतही या नागरिकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी रस्ते व गटारींची समस्या सोडवली नाही तरी चालेल. मात्र, पाण्याची समस्या लवकर सोडविण्याची अपेक्षाही या नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

गेल्या अनेक वर्षांपासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, ना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली ना रस्ते, गटारींची. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने जार विकत आणून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.

राजेंद्र पाटील, रहिवासी

पाण्याच्या समस्येबाबत जळगाव मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. रहिवाशांना यामुळे बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचेही पाणी कमी होत असल्याने आम्हा रहिवाशांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे.

चंद्रकांत मोरे,रहिवासी

पाणीटंचाईचा सर्वात मोठा महिलांना करावा लागतो. घरात पाणी नसल्याने इतर कामेही अडून पडतात. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईच्या समस्येचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सुमन राठोड, रहिवासी

या भागात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याशिवाय दुसरी व्यवस्था नाही. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.

कलाबाई पाटील, रहिवासी