शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:06 IST

ग्रामस्थांशी साधला संवाद

ठळक मुद्देमहाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईलगावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले. या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन सुरू केले तेव्हा जे स्वप्न पाहिले होते ते आज या गावात येऊन पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे आमिर खान म्हणाले.सुरुवातीला त्यांनी मराठीत नमस्कार या गावात येऊन आनंद वाटलो , तुमचा गावच काम छान आहे. स्पर्धेत कोण जिंकेल यापेक्षा गावाने मन जिंकले हे महत्वाचे आहे असेही आमिर खान म्हणाले. गावाची आठवण राहील असे सांगताना ‘याद’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात असे किरण राव यांना विचारले. येथील रोप वाटिका व ग्रीन हाऊस आवडले, शोष खड्ड्यात प्रत्येक घराचा हिस्सा असून सोबतच गाव कला, शांतता, व संस्कृकतेचे प्रतीक असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.किरण राव म्हणाल्या की या गावातील शिस्तीतील कामे आणि प्रत्येक कामाची वेगळी समिती कुठेच पहिली नाही. यालाच लोकचळवळ म्हणतात जवखेडा गावाची महिला शक्ती मजबूत आहे, या गावाला सलाम, असेही त्या शेवटी म्हणाल्या.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीही या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन स्पर्धेत पाहिले येईल, असा विश्वास व्यक्त केला.अमिरखान व किरण राव यांनी संयुक्तरित्या लगान चित्रपटाचे ‘आजारे... आजारे ...भले कीतने भी लम्बे रस्ते हो...इस धरतीका है राजा जाण ले तू’ हे गीत सादर केले . सूत्रसंचालन मयूर पाटील व सुनील पाटील यांनी केलेतत्पूर्वी अमिरखान यांनी मयूर पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील, डॉ. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करून कामाचे स्वरूप व नियोजनाची माहिती घेतली. ो

टॅग्स :Jalgaonजळगाव