शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या ...

जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाजवळील गुरू कॉलनी येथे घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैष्णवी ही गुरू कॉलनी येथे वडील किशोर, आई सविता आणि लहान भावासह वास्तव्यास होती. ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रथम वर्षाच्या परीक्षेत ती नापास झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या माध्यमातून पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी संधी दिली जाते. तिने ही परीक्षा दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, त्यात कमी गुण मिळाल्याने नापास झाली. याचा आघात तिच्या मनाला बसल्याने सायंकाळी आई-वडील घराच्या खालच्या मजल्यावर असताना, तिने वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळेनंतर हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला गळफास घेतल्याचे पाहून आक्रोश केला. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला. सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी सीएमओ डॉ. नीता पवार यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी हिचे आई-वडील हे शिक्षक आहेत.

शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घेतली धाव

वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची बातमी समजल्यानंतर शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेनंतर घराची झडती घेतली. उशिरापर्यंत सुसाईड नोट किंवा अन्य वस्तू आढळून आल्या नव्हत्या.

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमधील दुसरी घटना

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सहकारी मैत्रिणींकडून झालेल्या त्रासातून त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा त्या वेळी आरोप होता. त्यानंतर या काॅलेजच्या दुसऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. त्या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.

कोट

वैष्णवी ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होती. मात्र त्या वेळी ती नापास झाली होती. पुनर्परीक्षेची तिला संधी मिळाली होती. मात्र त्यातही तिला अपयश आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी.

- प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी, डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेज