शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST

जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या ...

जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाजवळील गुरू कॉलनी येथे घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैष्णवी ही गुरू कॉलनी येथे वडील किशोर, आई सविता आणि लहान भावासह वास्तव्यास होती. ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रथम वर्षाच्या परीक्षेत ती नापास झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या माध्यमातून पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी संधी दिली जाते. तिने ही परीक्षा दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, त्यात कमी गुण मिळाल्याने नापास झाली. याचा आघात तिच्या मनाला बसल्याने सायंकाळी आई-वडील घराच्या खालच्या मजल्यावर असताना, तिने वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळेनंतर हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला गळफास घेतल्याचे पाहून आक्रोश केला. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला. सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी सीएमओ डॉ. नीता पवार यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी हिचे आई-वडील हे शिक्षक आहेत.

शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घेतली धाव

वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची बातमी समजल्यानंतर शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेनंतर घराची झडती घेतली. उशिरापर्यंत सुसाईड नोट किंवा अन्य वस्तू आढळून आल्या नव्हत्या.

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमधील दुसरी घटना

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सहकारी मैत्रिणींकडून झालेल्या त्रासातून त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा त्या वेळी आरोप होता. त्यानंतर या काॅलेजच्या दुसऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. त्या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.

कोट

वैष्णवी ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होती. मात्र त्या वेळी ती नापास झाली होती. पुनर्परीक्षेची तिला संधी मिळाली होती. मात्र त्यातही तिला अपयश आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी.

- प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी, डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेज