शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:10 IST

नानासाहेबांकडून पिढी घडविण्याचे कार्य - गुलाबराव पाटील यांचे मत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पिढी घडविण्याचे कार्य सुरु आहे, असे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले.पुढारी खरं बोलत नाही आणि जनतेला खरं बोललेलं चालत नाही, मात्र या व्यासपीठावर खोटं बोलता येणार नाही, असे सांगत डॉ.नानासाहेबांच्या उदात्त कार्याचे त्यांनी कौतुक केले.पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, उपसभापती शितल पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पं. स. सदस्या ज्योती महाजन, विमल बागुल व नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटविकास अधिकारी शकुंतला सोनवणे, फुपणीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, अ‍ॅड.हर्षल चौधरी, जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे आदींची मुख्य उपस्थिती होती.सद्गुुरु बैठकींमधून खूप चांगले काम सुरु आहे. आम्ही पुढारी वृक्षारोपण करुन मोकळे होतो आणि स्वच्छता मोहिमेचा झाडू फक्त फोटो काढाण्यापुरता हातात घेतो. परंतु हे कार्य धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य प्रामाणिकपणे करीत आहे. अशा धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समांतर सरकार असायला हवे, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेतही त्यांच्या प्रतिमा अनावरणाचा विचार लवकर अंमलात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. तर महिलांसह मोठ्या उपस्थितीचे कौतुक करताना राजकारण्यांना एवढी गर्दी जमा करायची असेल तर ५ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे सांगून हे सर्व नानासाहेबांच्या श्रद्धेने शक्य आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.मी सरळ वागायला लागलो... गुलाबराव पाटीलयावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, योगायोगाने अप्पासाहेबांची माझी मागे भेट झाली. यानंतर माझ्या कार्यालयात नानासाहेबांचा फोटो लावला आणि मी सरळ वागायला लागलो. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर काही वेळ तरी आपण ठिकाणावर येतो, असेही ते म्हणाले.नानासाहेब यांच्या विचारांची राजकीय मंडळींना गरजएक वेळ रस्ते बनले नाही तरी चालेल पण पिढी घडण्याचे काम होणे गरजेचे आहे... आणि हे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादनही गुलाबराव पाटील यांंनी केले. यावेळी सुरेश भोळे म्हणाले की, नानासाहेबांच्या विचारांची राजकीय लोकांना खरी गरज असून त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला हवे. तसेच जळकेकर महाराज यांनीही विचार व्यक्त केले.भाविका सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव