शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:10 IST

नानासाहेबांकडून पिढी घडविण्याचे कार्य - गुलाबराव पाटील यांचे मत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पिढी घडविण्याचे कार्य सुरु आहे, असे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले.पुढारी खरं बोलत नाही आणि जनतेला खरं बोललेलं चालत नाही, मात्र या व्यासपीठावर खोटं बोलता येणार नाही, असे सांगत डॉ.नानासाहेबांच्या उदात्त कार्याचे त्यांनी कौतुक केले.पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, उपसभापती शितल पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पं. स. सदस्या ज्योती महाजन, विमल बागुल व नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटविकास अधिकारी शकुंतला सोनवणे, फुपणीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, अ‍ॅड.हर्षल चौधरी, जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे आदींची मुख्य उपस्थिती होती.सद्गुुरु बैठकींमधून खूप चांगले काम सुरु आहे. आम्ही पुढारी वृक्षारोपण करुन मोकळे होतो आणि स्वच्छता मोहिमेचा झाडू फक्त फोटो काढाण्यापुरता हातात घेतो. परंतु हे कार्य धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य प्रामाणिकपणे करीत आहे. अशा धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समांतर सरकार असायला हवे, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेतही त्यांच्या प्रतिमा अनावरणाचा विचार लवकर अंमलात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. तर महिलांसह मोठ्या उपस्थितीचे कौतुक करताना राजकारण्यांना एवढी गर्दी जमा करायची असेल तर ५ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे सांगून हे सर्व नानासाहेबांच्या श्रद्धेने शक्य आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.मी सरळ वागायला लागलो... गुलाबराव पाटीलयावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, योगायोगाने अप्पासाहेबांची माझी मागे भेट झाली. यानंतर माझ्या कार्यालयात नानासाहेबांचा फोटो लावला आणि मी सरळ वागायला लागलो. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर काही वेळ तरी आपण ठिकाणावर येतो, असेही ते म्हणाले.नानासाहेब यांच्या विचारांची राजकीय मंडळींना गरजएक वेळ रस्ते बनले नाही तरी चालेल पण पिढी घडण्याचे काम होणे गरजेचे आहे... आणि हे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादनही गुलाबराव पाटील यांंनी केले. यावेळी सुरेश भोळे म्हणाले की, नानासाहेबांच्या विचारांची राजकीय लोकांना खरी गरज असून त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला हवे. तसेच जळकेकर महाराज यांनीही विचार व्यक्त केले.भाविका सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव