शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जळगावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:10 IST

नानासाहेबांकडून पिढी घडविण्याचे कार्य - गुलाबराव पाटील यांचे मत

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १२ - डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पिढी घडविण्याचे कार्य सुरु आहे, असे स्पष्ट मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले.पुढारी खरं बोलत नाही आणि जनतेला खरं बोललेलं चालत नाही, मात्र या व्यासपीठावर खोटं बोलता येणार नाही, असे सांगत डॉ.नानासाहेबांच्या उदात्त कार्याचे त्यांनी कौतुक केले.पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते. व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, उपसभापती शितल पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पं. स. सदस्या ज्योती महाजन, विमल बागुल व नंदलाल पाटील, गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटविकास अधिकारी शकुंतला सोनवणे, फुपणीचे सरपंच डॉ. कमलाकर पाटील, अ‍ॅड.हर्षल चौधरी, जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे आदींची मुख्य उपस्थिती होती.सद्गुुरु बैठकींमधून खूप चांगले काम सुरु आहे. आम्ही पुढारी वृक्षारोपण करुन मोकळे होतो आणि स्वच्छता मोहिमेचा झाडू फक्त फोटो काढाण्यापुरता हातात घेतो. परंतु हे कार्य धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य प्रामाणिकपणे करीत आहे. अशा धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समांतर सरकार असायला हवे, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेतही त्यांच्या प्रतिमा अनावरणाचा विचार लवकर अंमलात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. तर महिलांसह मोठ्या उपस्थितीचे कौतुक करताना राजकारण्यांना एवढी गर्दी जमा करायची असेल तर ५ लाख रुपये खर्च करावे लागतात, असे सांगून हे सर्व नानासाहेबांच्या श्रद्धेने शक्य आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.मी सरळ वागायला लागलो... गुलाबराव पाटीलयावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, योगायोगाने अप्पासाहेबांची माझी मागे भेट झाली. यानंतर माझ्या कार्यालयात नानासाहेबांचा फोटो लावला आणि मी सरळ वागायला लागलो. त्यांच्या फोटोकडे पाहिल्यावर काही वेळ तरी आपण ठिकाणावर येतो, असेही ते म्हणाले.नानासाहेब यांच्या विचारांची राजकीय मंडळींना गरजएक वेळ रस्ते बनले नाही तरी चालेल पण पिढी घडण्याचे काम होणे गरजेचे आहे... आणि हे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादनही गुलाबराव पाटील यांंनी केले. यावेळी सुरेश भोळे म्हणाले की, नानासाहेबांच्या विचारांची राजकीय लोकांना खरी गरज असून त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला हवे. तसेच जळकेकर महाराज यांनीही विचार व्यक्त केले.भाविका सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव