शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

मुंबईला ड्युटी नको रे बाबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत आहे. मुंबईहुन आल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांमधून मुंबईला ड्युटीला जाण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे.

मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जळगाव विभागातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्या पासून कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत आहे. दर आठवड्याला जिल्हा भरातून विविध आगारांचे एकूण ५० चालक व वाहक मुंबईला जात आहेत. मात्र, त्या ठिकाणाहून आल्यानंतर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. महामंडळाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत असून, परिणामी कामगार संघटनांनी या निर्णया विरोधात आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शविली आहे.दरम्यान,

मुंबईला राहण्याची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येत असून, फक्त जेवणासाठी २५० रुपये भत्ता देण्यात येत आहे. मात्र, जादा वेतन ना इतर कुठलेही लाभ देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून सुरुवातीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. तसेच त्यांच्या कुटूंबियांनाही यातून लागण होत आहे. आता तर ८ दिवस ऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा संघटनेतर्फे महामंडळा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना, जळगाव विभाग

इन्फो :

मुंबईत कोरोनाची परिस्थिती खूप भयावह आहे. खूप भीतीने काम करावे लागते.मात्र, योग्य ती खबरदारी घेऊनही अनेक कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. महामंडळ प्रशासनाने तात्काळ आमची मुंबईची सेवा थांबवावी.

एक वाहक, जळगाव आगार

इन्फो :

जळगावला कोरोनाची लागण न झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेल्यावर कोरोना झाला. या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने मुंबईची सेवा थांबविणे गरजेचे असून, अन्यथा कर्मचारी आंदोलन पुकारतील.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो :

- गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातून १२०० जणांना पाठवले.

चालक ६००

वाहक - ६००

मुंबईहुन परत आल्यानंतर आढळले ५० जण पॉझिटिव्ह

इन्फो :

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबईतहुन आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.माञ, एकूण किती कर्मचाऱ्यांना लागण झाली, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याचे आगार प्रशासनतर्फे सांगण्यात आले. तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोरोना व्यक्तीरिक्त वातावरण बदलाचा त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईची ड्युटी नको रे बाबा,असा कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.