शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला ड्युटी नको रे बाबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत आहे. मुंबईहुन आल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांमधून मुंबईला ड्युटीला जाण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे.

मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जळगाव विभागातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्या पासून कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत आहे. दर आठवड्याला जिल्हा भरातून विविध आगारांचे एकूण ५० चालक व वाहक मुंबईला जात आहेत. मात्र, त्या ठिकाणाहून आल्यानंतर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. महामंडळाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत असून, परिणामी कामगार संघटनांनी या निर्णया विरोधात आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शविली आहे.दरम्यान,

मुंबईला राहण्याची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येत असून, फक्त जेवणासाठी २५० रुपये भत्ता देण्यात येत आहे. मात्र, जादा वेतन ना इतर कुठलेही लाभ देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून सुरुवातीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. तसेच त्यांच्या कुटूंबियांनाही यातून लागण होत आहे. आता तर ८ दिवस ऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा संघटनेतर्फे महामंडळा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना, जळगाव विभाग

इन्फो :

मुंबईत कोरोनाची परिस्थिती खूप भयावह आहे. खूप भीतीने काम करावे लागते.मात्र, योग्य ती खबरदारी घेऊनही अनेक कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. महामंडळ प्रशासनाने तात्काळ आमची मुंबईची सेवा थांबवावी.

एक वाहक, जळगाव आगार

इन्फो :

जळगावला कोरोनाची लागण न झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेल्यावर कोरोना झाला. या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने मुंबईची सेवा थांबविणे गरजेचे असून, अन्यथा कर्मचारी आंदोलन पुकारतील.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो :

- गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातून १२०० जणांना पाठवले.

चालक ६००

वाहक - ६००

मुंबईहुन परत आल्यानंतर आढळले ५० जण पॉझिटिव्ह

इन्फो :

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबईतहुन आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.माञ, एकूण किती कर्मचाऱ्यांना लागण झाली, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याचे आगार प्रशासनतर्फे सांगण्यात आले. तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोरोना व्यक्तीरिक्त वातावरण बदलाचा त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईची ड्युटी नको रे बाबा,असा कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.