शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:32 IST

चालढकल करणे योग्य नाही

विकास पाटीलमोकाट कुत्रे जळगावकरांच्या जिवावर उठले आहेत. दररोज ते अबालवृद्धांचे लचके तोडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत असताना केवळ चालढकल केली जात असल्याने शहरवासी नाराज आहेत.जळगावात २१ आॅक्टोबर रोजी गोपाळपुरा भागात एका सात वर्षांच्या बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. याचवेळी त्या बालकाची बहिणही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर शहर व परिसरात याच दिवशी आणखी इतर तीन बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य बनविले. दररोज कुत्रे हल्ले करीत आहे.जळगाव शहरात कदापी कुणालाही सहज विश्वास बसणार नाही मात्र ५ हजार मोकाट कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात हिंडत असतात. रात्रीच्यावेळी तर भर रस्त्यावर ते ठिय्या मांडतात व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा व पादचाºयांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्रपाळीची नोकरी करणारे त्रस्त आहेत.गेल्या नऊ महिन्यात कुत्र्यांनी साधारणत: साडेचार हजार नागरिकांना चावा घेतला व त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारी आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेतात, त्यांची नोंद नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही, हे विशेष. गोपाळपुºयातील घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागाची बैठक घेवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डॉग रुम तयार केली आहे. तशीच रुम तयार करुन निर्बीजीकरण करण्याचे ठरविले आहे. एका कुत्र्यावर एक हजार रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महासभेत निर्णय होईल, त्यानंतर पुढे प्रक्रिया सुरु होईल अन् कुत्र्यांचे चावे थांबतील. मात्र तोपर्यंत काय?मनपाकडे डॉग व्हॅन आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहरापासून सोडण्याचे काम या वाहनाद्वारे होत असे. मात्र आता हे वाहन कुठे आहे? हे महापालिकेलाच माहित. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करणे आवश्यक आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबतीत चालढकल करणे योग्य नाही.यापूर्वीही शहरात एकाच दिवशी १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडूनकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले मात्र उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नाराजी आहे. प्रशासन जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.