शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:32 IST

चालढकल करणे योग्य नाही

विकास पाटीलमोकाट कुत्रे जळगावकरांच्या जिवावर उठले आहेत. दररोज ते अबालवृद्धांचे लचके तोडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत असताना केवळ चालढकल केली जात असल्याने शहरवासी नाराज आहेत.जळगावात २१ आॅक्टोबर रोजी गोपाळपुरा भागात एका सात वर्षांच्या बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. याचवेळी त्या बालकाची बहिणही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर शहर व परिसरात याच दिवशी आणखी इतर तीन बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य बनविले. दररोज कुत्रे हल्ले करीत आहे.जळगाव शहरात कदापी कुणालाही सहज विश्वास बसणार नाही मात्र ५ हजार मोकाट कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात हिंडत असतात. रात्रीच्यावेळी तर भर रस्त्यावर ते ठिय्या मांडतात व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा व पादचाºयांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्रपाळीची नोकरी करणारे त्रस्त आहेत.गेल्या नऊ महिन्यात कुत्र्यांनी साधारणत: साडेचार हजार नागरिकांना चावा घेतला व त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारी आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेतात, त्यांची नोंद नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही, हे विशेष. गोपाळपुºयातील घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागाची बैठक घेवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डॉग रुम तयार केली आहे. तशीच रुम तयार करुन निर्बीजीकरण करण्याचे ठरविले आहे. एका कुत्र्यावर एक हजार रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महासभेत निर्णय होईल, त्यानंतर पुढे प्रक्रिया सुरु होईल अन् कुत्र्यांचे चावे थांबतील. मात्र तोपर्यंत काय?मनपाकडे डॉग व्हॅन आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहरापासून सोडण्याचे काम या वाहनाद्वारे होत असे. मात्र आता हे वाहन कुठे आहे? हे महापालिकेलाच माहित. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करणे आवश्यक आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबतीत चालढकल करणे योग्य नाही.यापूर्वीही शहरात एकाच दिवशी १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडूनकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले मात्र उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नाराजी आहे. प्रशासन जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.