शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:32 IST

चालढकल करणे योग्य नाही

विकास पाटीलमोकाट कुत्रे जळगावकरांच्या जिवावर उठले आहेत. दररोज ते अबालवृद्धांचे लचके तोडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत असताना केवळ चालढकल केली जात असल्याने शहरवासी नाराज आहेत.जळगावात २१ आॅक्टोबर रोजी गोपाळपुरा भागात एका सात वर्षांच्या बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. याचवेळी त्या बालकाची बहिणही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर शहर व परिसरात याच दिवशी आणखी इतर तीन बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य बनविले. दररोज कुत्रे हल्ले करीत आहे.जळगाव शहरात कदापी कुणालाही सहज विश्वास बसणार नाही मात्र ५ हजार मोकाट कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात हिंडत असतात. रात्रीच्यावेळी तर भर रस्त्यावर ते ठिय्या मांडतात व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा व पादचाºयांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्रपाळीची नोकरी करणारे त्रस्त आहेत.गेल्या नऊ महिन्यात कुत्र्यांनी साधारणत: साडेचार हजार नागरिकांना चावा घेतला व त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारी आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेतात, त्यांची नोंद नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही, हे विशेष. गोपाळपुºयातील घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागाची बैठक घेवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डॉग रुम तयार केली आहे. तशीच रुम तयार करुन निर्बीजीकरण करण्याचे ठरविले आहे. एका कुत्र्यावर एक हजार रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महासभेत निर्णय होईल, त्यानंतर पुढे प्रक्रिया सुरु होईल अन् कुत्र्यांचे चावे थांबतील. मात्र तोपर्यंत काय?मनपाकडे डॉग व्हॅन आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहरापासून सोडण्याचे काम या वाहनाद्वारे होत असे. मात्र आता हे वाहन कुठे आहे? हे महापालिकेलाच माहित. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करणे आवश्यक आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबतीत चालढकल करणे योग्य नाही.यापूर्वीही शहरात एकाच दिवशी १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडूनकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले मात्र उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नाराजी आहे. प्रशासन जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.