शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का?, सर्वसामान्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:39 IST

बैठक रद्द होवून उलटले 14 दिवस

ठळक मुद्दे बैठक न झाल्याने  नाराजीपाठपुरावा करणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री बैठक केव्हा घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान स्वत: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांना 18 डिसेंबर ही जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र ऐनवेळी ती रद्द केल्याने व अजूनही ती न झाल्याने  नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की, विदर्भ तसेच मराठवाडा आदी भागातील प्रश्न ज्या प्रमाणे सुटतात, त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय होते. या भावनेतून अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या भागातील मंत्री व आमदार अशा 35 जणांच्या गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत रोष व्यक्त केला होता. उत्तर महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून त्या प्रश्नांची दखल घेत ते प्रश्नही सोडविण्यात यावे, अशी मागणी या आमदारांनी केली होती.  यानंतर या भागालाही योग्य न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यानुसार 18 रोजी जळगाव जिल्ह्याची बैठक घेतली जाणार होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अन्य काम निघाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली तसेच   विविध समस्यांचा आढावा प्रथमत: जिल्हाधिकारी घेतील असेही सांगण्यात आले. बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र सुरुवातीस आयोजित केल्यानुसार या बैठकीची तारीख उलटून जवळपास 14 दिवस झाले तरीही ही अद्यार्पयत ही बैठक होवू शकलेली नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांना उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी वेळ नाही का? असा सवालही सर्वसामान्य जनतेकडून  व्यक्त होत आहे. आठवडाभरात बैठक - गिरीश महाजन मागील काही दिवस अधिवेशनाच्या गडबडीत गेले. मुख्यमंत्री हे स्वत: उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नी गंभीर असून जवळपास आठवडाभरात याबाबत जिल्ह्याची बैठक होवू शकते, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पाठपुरावा करु - गुलाबराव पाटील अधिवेशन आटोपल्यावर मंत्रालयाच्या कामकाजास ख:या अर्थाने 1 तारखेपासून सुरुवात झाली आहे. 2 रोजी मंत्रीमंडळाची बैठक असून उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळवा म्हणून आपण पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. लवकर वेळ काढावा - डॉ. सतीश पाटीलजिल्ह्यात खूपच प्रश्न प्रलंबित आहेत. दोन वर्षापासून काहीच कामे झाली नाहीत. यामुळे जनतेत मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. या बाबीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेत लवकरात लवकर वेळ काढून विविध प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.