शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का?, सर्वसामान्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:39 IST

बैठक रद्द होवून उलटले 14 दिवस

ठळक मुद्दे बैठक न झाल्याने  नाराजीपाठपुरावा करणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री बैठक केव्हा घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान स्वत: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांना 18 डिसेंबर ही जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र ऐनवेळी ती रद्द केल्याने व अजूनही ती न झाल्याने  नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की, विदर्भ तसेच मराठवाडा आदी भागातील प्रश्न ज्या प्रमाणे सुटतात, त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय होते. या भावनेतून अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या भागातील मंत्री व आमदार अशा 35 जणांच्या गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत रोष व्यक्त केला होता. उत्तर महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून त्या प्रश्नांची दखल घेत ते प्रश्नही सोडविण्यात यावे, अशी मागणी या आमदारांनी केली होती.  यानंतर या भागालाही योग्य न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यानुसार 18 रोजी जळगाव जिल्ह्याची बैठक घेतली जाणार होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अन्य काम निघाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली तसेच   विविध समस्यांचा आढावा प्रथमत: जिल्हाधिकारी घेतील असेही सांगण्यात आले. बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र सुरुवातीस आयोजित केल्यानुसार या बैठकीची तारीख उलटून जवळपास 14 दिवस झाले तरीही ही अद्यार्पयत ही बैठक होवू शकलेली नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांना उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी वेळ नाही का? असा सवालही सर्वसामान्य जनतेकडून  व्यक्त होत आहे. आठवडाभरात बैठक - गिरीश महाजन मागील काही दिवस अधिवेशनाच्या गडबडीत गेले. मुख्यमंत्री हे स्वत: उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नी गंभीर असून जवळपास आठवडाभरात याबाबत जिल्ह्याची बैठक होवू शकते, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पाठपुरावा करु - गुलाबराव पाटील अधिवेशन आटोपल्यावर मंत्रालयाच्या कामकाजास ख:या अर्थाने 1 तारखेपासून सुरुवात झाली आहे. 2 रोजी मंत्रीमंडळाची बैठक असून उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळवा म्हणून आपण पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. लवकर वेळ काढावा - डॉ. सतीश पाटीलजिल्ह्यात खूपच प्रश्न प्रलंबित आहेत. दोन वर्षापासून काहीच कामे झाली नाहीत. यामुळे जनतेत मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. या बाबीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेत लवकरात लवकर वेळ काढून विविध प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.