शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट (डमी ९८३) लोकमत न्यूज ...

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट

(डमी ९८३)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातची पिकेदेखील वाया गेली होती. मात्र, नुकसानभरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला होता. त्यामुळे यावर्षी खरीप पीकविमा योजनेंतर्गत काढण्यात येणाऱ्या विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, तर यावर्षी १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेत लाभ मिळणे कठीण झाले असून, केवळ पीकविमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोट..

जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अद्याप बँकेंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. ती संख्या आल्यास संख्या पुन्हा वाढलेली दिसून येईल.

-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक

४० हजार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

१. जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता.

२. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे काही अंशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण संख्येत ४० हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी १२ लाख

गेल्यावर्षी - १ लाख ६६ हजार ४९९

यावर्षी - १ लाख १९ हजार ३८८

एकूण खरीप क्षेत्र - ७ लाख २२ हजार हेक्टर

तालुकानिहाय विमाधारक

अमळनेर - ३१ हजार ७८९

चोपडा - १४ हजार ००३

जामनेर - १९ हजार ९९४

जळगाव - ३ हजार १९८

पारोळा - १८ हजार २३४

धरणगाव - ९ हजार ४६९

कोट

खरीप पीकविमा योजनेंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते. मात्र, गेल्यावर्षी आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच नाही. यामुळे यंदा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. काढूनदेखील पैसे वाया गेलेच असते. त्यापेक्षा विमा काढलेलाच न बरा.

-पंकज संभाजी पाटील, शेतकरी

गेल्यावर्षी विमा काढूनदेखील आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. पिकांचे नुकसान झाले. त्यात लावलेल्या खर्चाइतके उत्पन्नदेखील आम्हाला झाले नाही. यावर्षी विमा काढायचा का नाही? हा प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता विमा न काढलेलाच बरा. असा शेतकऱ्यांचा कमी, विमा कंपन्यांचाच यामध्ये फायदा होत असतो.

-संजय सुभाष पाटील, शेतकरी