शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट (डमी ९८३) लोकमत न्यूज ...

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट

(डमी ९८३)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातची पिकेदेखील वाया गेली होती. मात्र, नुकसानभरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला होता. त्यामुळे यावर्षी खरीप पीकविमा योजनेंतर्गत काढण्यात येणाऱ्या विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, तर यावर्षी १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेत लाभ मिळणे कठीण झाले असून, केवळ पीकविमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोट..

जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अद्याप बँकेंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. ती संख्या आल्यास संख्या पुन्हा वाढलेली दिसून येईल.

-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक

४० हजार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

१. जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता.

२. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे काही अंशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण संख्येत ४० हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी १२ लाख

गेल्यावर्षी - १ लाख ६६ हजार ४९९

यावर्षी - १ लाख १९ हजार ३८८

एकूण खरीप क्षेत्र - ७ लाख २२ हजार हेक्टर

तालुकानिहाय विमाधारक

अमळनेर - ३१ हजार ७८९

चोपडा - १४ हजार ००३

जामनेर - १९ हजार ९९४

जळगाव - ३ हजार १९८

पारोळा - १८ हजार २३४

धरणगाव - ९ हजार ४६९

कोट

खरीप पीकविमा योजनेंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते. मात्र, गेल्यावर्षी आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच नाही. यामुळे यंदा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. काढूनदेखील पैसे वाया गेलेच असते. त्यापेक्षा विमा काढलेलाच न बरा.

-पंकज संभाजी पाटील, शेतकरी

गेल्यावर्षी विमा काढूनदेखील आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. पिकांचे नुकसान झाले. त्यात लावलेल्या खर्चाइतके उत्पन्नदेखील आम्हाला झाले नाही. यावर्षी विमा काढायचा का नाही? हा प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता विमा न काढलेलाच बरा. असा शेतकऱ्यांचा कमी, विमा कंपन्यांचाच यामध्ये फायदा होत असतो.

-संजय सुभाष पाटील, शेतकरी