शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट (डमी ९८३) लोकमत न्यूज ...

१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट

(डमी ९८३)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातची पिकेदेखील वाया गेली होती. मात्र, नुकसानभरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला होता. त्यामुळे यावर्षी खरीप पीकविमा योजनेंतर्गत काढण्यात येणाऱ्या विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, तर यावर्षी १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेत लाभ मिळणे कठीण झाले असून, केवळ पीकविमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

कोट..

जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अद्याप बँकेंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. ती संख्या आल्यास संख्या पुन्हा वाढलेली दिसून येईल.

-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक

४० हजार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

१. जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता.

२. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे काही अंशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण संख्येत ४० हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.

जिल्ह्यातील एकूण शेतकरी १२ लाख

गेल्यावर्षी - १ लाख ६६ हजार ४९९

यावर्षी - १ लाख १९ हजार ३८८

एकूण खरीप क्षेत्र - ७ लाख २२ हजार हेक्टर

तालुकानिहाय विमाधारक

अमळनेर - ३१ हजार ७८९

चोपडा - १४ हजार ००३

जामनेर - १९ हजार ९९४

जळगाव - ३ हजार १९८

पारोळा - १८ हजार २३४

धरणगाव - ९ हजार ४६९

कोट

खरीप पीकविमा योजनेंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते. मात्र, गेल्यावर्षी आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच नाही. यामुळे यंदा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. काढूनदेखील पैसे वाया गेलेच असते. त्यापेक्षा विमा काढलेलाच न बरा.

-पंकज संभाजी पाटील, शेतकरी

गेल्यावर्षी विमा काढूनदेखील आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. पिकांचे नुकसान झाले. त्यात लावलेल्या खर्चाइतके उत्पन्नदेखील आम्हाला झाले नाही. यावर्षी विमा काढायचा का नाही? हा प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता विमा न काढलेलाच बरा. असा शेतकऱ्यांचा कमी, विमा कंपन्यांचाच यामध्ये फायदा होत असतो.

-संजय सुभाष पाटील, शेतकरी