शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

चायनिज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:18 IST

(डमी १२०८) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बदलत्या जीवनपद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, त्यात आता ...

(डमी १२०८)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बदलत्या जीवनपद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, त्यात आता भर पडली आहे. बदलत्या खाणपानाची, अनेकजण विशेषकरून लहान मुलं चव पाहून रस्त्यावर मिळणाऱ्या चायनिज पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. जिभेचे लाड पुरविण्यासाठी लहान मुलांपासून महाविद्यालयीन युवकदेखील चायनिज पदार्थांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, या पदार्थांमधील चव वाढविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अजिनोमोटोसह इतर पदार्थांमध्ये चायनिज पदार्थ विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.

चायनिज पदार्थांत अजिनोमोटो अर्थात मोनो सोडियम ग्लूटामिटचा वापर केला जातो. यामुळे पोटाचे विकार वाढत आहेत. यासह लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, युवकांमध्ये अल्सरसारखे आजार वाढत जात आहेत. पौष्टिक पदार्थ सोडून आता युवकांचा कल रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांकडे जास्त आहे. जळगाव शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यालगत असो वा कॉलनी, नगरच्या कॉर्नरवर चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या असतात. चायनिज पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास या पदार्थांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे अजिनोमोटो?

अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट सिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. याचा वापर पूर्वी इतर देशात व्हायचा. पण आता भारतातसुद्धा चायनिज पदार्थ व इतर पदार्थांमध्येसुद्धा याचा वापर केला जातो. चायनीज पदार्थ किंवा हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता नॉनव्हेज पदार्थ, अंडाकरी तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो.

म्हणून चायनिज खाणे टाळा..

नागरिकांना नकळत जेवणातून घातक आजार मोफत मिळत आहेत. अतिप्रमाणात सतत सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कितीतरी पटीने वाढतो तसेच आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह लहान मुलांमध्ये लठ्ठपणा, अल्सरसारखे आजारदेखील वाढत आहेत.

कोट..

चायनिज पदार्थच नाही तर हॉटेल व रस्त्यावर विक्री होणारे पदार्थदेखील खाणे बंद केले पाहिजे. हॉटेलमधील जेवण चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर होत असल्याने त्याचे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. कोरोनाच्या काळात नागरिक आरोग्याची काळजी घेत असताना, अशा प्रकारे उघड्यावरील पदार्थ खावून आजारांना निमंत्रण देणे चुकीचे आहे.

- डॉ. उत्तम चौधरी, फिजिशियन