शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याचा राजकारणापेक्षा, बदलाचे राजकारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी बदल्याचे राजकारण न ‘बदला’च्या राजकारणावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत खासदार उन्मेष पाटील यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यासाठी निवडणूक योग्य वेळ असते, तेव्हाच या आरोपांना महत्व दिले गेले पाहिजे असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या अर्थ संकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असताना जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांना निधी मिळाला नाही असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपांबाबत खासदार उन्मेष पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेज, लोंढे-वरखेडे बॅरेजच्या कामासाठी निधी मिळाला हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याचा विकास करताना सर्वांनी सोबत येण्याची गरज आहे. यामध्ये ‘मी-तु’ करण्याची गरज नसल्याचा टोलाही खासदार पाटील यांनी खडसे यांना लगावला आहे.

अनधिकृत वाळू उपस्याबाबत कारवाई करावी

चाळीसगाव तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याचे सांगून वाळू माफियांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देत खासदार पाटील यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून, वाळू माफियांना कोणाचा वरदहस्त नसल्याचेही म्हटले आहे.

नैतिकता ठेवून प्रवेश करायचा होता - आमदार भोळे

भुसावळातील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पळवाटा शोधल्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करताना नगरसेवकांनी नैतिकता दाखवून पक्षाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा होता. मात्र, त्यांनी नैतिकता दाखविली नसल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले. वर्षभरातच निवडणूका असून, या निवडणुकामध्ये जनताच यांना उत्तर देईल असे आमदार भोळे यांनी सांगितले. काही जण पक्ष सोडून गेले असले तरी इतर जण देखील भाजपात आले आहेत.