शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याचा राजकारणापेक्षा, बदलाचे राजकारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी बदल्याचे राजकारण न ‘बदला’च्या राजकारणावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत खासदार उन्मेष पाटील यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यासाठी निवडणूक योग्य वेळ असते, तेव्हाच या आरोपांना महत्व दिले गेले पाहिजे असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या अर्थ संकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असताना जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांना निधी मिळाला नाही असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपांबाबत खासदार उन्मेष पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेज, लोंढे-वरखेडे बॅरेजच्या कामासाठी निधी मिळाला हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याचा विकास करताना सर्वांनी सोबत येण्याची गरज आहे. यामध्ये ‘मी-तु’ करण्याची गरज नसल्याचा टोलाही खासदार पाटील यांनी खडसे यांना लगावला आहे.

अनधिकृत वाळू उपस्याबाबत कारवाई करावी

चाळीसगाव तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याचे सांगून वाळू माफियांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देत खासदार पाटील यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून, वाळू माफियांना कोणाचा वरदहस्त नसल्याचेही म्हटले आहे.

नैतिकता ठेवून प्रवेश करायचा होता - आमदार भोळे

भुसावळातील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पळवाटा शोधल्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करताना नगरसेवकांनी नैतिकता दाखवून पक्षाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा होता. मात्र, त्यांनी नैतिकता दाखविली नसल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले. वर्षभरातच निवडणूका असून, या निवडणुकामध्ये जनताच यांना उत्तर देईल असे आमदार भोळे यांनी सांगितले. काही जण पक्ष सोडून गेले असले तरी इतर जण देखील भाजपात आले आहेत.