शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन जि.प. अध्यक्ष व सदस्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:27 IST

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरत या निधीचे वितरण करण्याची मागणी केली. तसेच या निधीवरुन भाजपाचे जि.प.सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती जि.प.सुत्रांनी दिली आहे. 

ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटकेसर्व सदस्यांना लवरकच निधी वितरण करू जि.प.अध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरत या निधीचे वितरण करण्याची मागणी केली. तसेच या निधीवरुन भाजपाचे जि.प.सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती जि.प.सुत्रांनी दिली आहे. 

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला २०१८ या वर्षासाठी विभागनिहाय देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी एकूण अंदाजे चाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र चार महिने उलटून देखील या निधीतील रक्कम जि.प.सदस्यांना मिळालेली नाही. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये नाराजी वाढली असून, जि.प.अध्यक्षांकडून दुर्लक्ष होत असल्याचेही सदस्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 

उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटकेजिल्हा परिषदेच्या विविध विभागाची पाहणी करताना, काही सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर झालेल्या निधीबाबत जि.प.अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जि.प.अध्यक्षा कार्यालयात येत नसल्याने निधीचे वितरण होत नसल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केला. त्यावर जि.प.अध्यक्षांनी सदस्यांचा आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या चेंबरमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, सदस्या पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, प्रताप पाटील व जयपाल बोदडे आदी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षा व सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. 

निधीचे लवकरच नियोजन करणारत्यानंतर जि.प.अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेवून, जिल्हा नियोजन मंडळाकडून ४० कोटीचा निधी मंजूर झाला असला तरी या निधीला शासनाने ३० टक्के कात्री लावली आहे. तसेच त्या निधीमध्ये गेल्या वर्षाचे दायित्व असल्यामुळे निधी तोकडा पडणार असल्याचे अध्यक्षा उज्वला पाटील यांनी सांगितले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोरमहाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. तसेच निधी बाबत पालकमंत्र्यांकडे दोन वेळा प्रस्ताव दिले असून, पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला  असून, निधी वाढवून मिळण्याची अपेक्षा असल्याची जि.प.अध्यक्षांनी दिली. 

चार विभागाच्या निधीचे नियोजन बाकीजिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा, जनसुविधा, तिर्थक्षेत्र व ग्रामिण रस्ते यांचे नियोजन बाकी असल्याची माहिती उज्वला पाटील यांनी दिली. या चार हेडवर निधी असला तरी देणे बाकी आहे. अधिक प्रस्ताव व निधी कमी असल्याने अडचण आहे. मात्र निधीचे तात्काळ नियोजन करून निधी वितरीत केला जाणार आहे. नागरी सुविधाला १ कोटीचा निधी आहे. जाहीर झाला मात्र त्यात ३० टक्के कपात होवून ७० लाख मिळणार आहेत.जनसुविधेसाठी २ कोटी ४५ मंजूर आहेत. मात्र खर्चासाठी १ कोटी ६५ मिळणार आहे. तर ग्रामीण रस्त्यासाठी मंजूर ९ कोटीमधून ६ कोटी तर तिर्थक्षेत्राच्या २ कोटीतून खर्चासाठी १ कोटी २५ लाख उपलब्ध होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.