शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 15:46 IST

कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे.

ठळक मुद्देव्यापाºयांचा हिरमोडअवघ्या १५ दिवसात सुमारे ४० हजार क्विंटल कापूस खरेदीचे आव्हान

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे. जामनेर व यावल येथील पन्नास गावांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. मात्र त्या गावातील किती शेतकरी व किती क्विंटल कापूस यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे किमान ४० हजार क्विंटल कापूस मोजण्याचे आव्हान सीसीआय कापूस खरेदी केंद्रला आहे.२३ मे रोजी दिले पंचनाम्याचे आदेशकापूस विक्रीसाठी सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी झाली. २२ मे पर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३९१ कापूस उत्पादक शेतकºयांच्या घरात कापूस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद झालेल्या याद्यांवरून दिसून आले. यातील केवळ चार हजार ८९३ शेतकºयांचा कापूस विक्री झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ४३ हजार ४९८ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस घरात पडून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या लक्षात आले. शेतकºयांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे व कसा? याचा अंदाज बांधता यावा यासाठी २३ मे रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांना तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. पंचनामा केल्यानंतर त्या याद्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे द्याव्या. सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना याद्या देऊन कापूस खरेदीच्या सूचना कराव्या, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.तहसील कार्यालचा पुन्हा बाजार समितीवरच विश्वासतालुक्यात कृ.उ.बा. समितीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना दिलेल्या २५ गावातील ७२९ शेतकºयांच्या याद्यांचे पंचनामे अवघ्या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले व ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यानंंतर दिसून आले. याद्यांमध्ये व्यापाºयांंनी त्यांच्या सोयीसाठी टाकलेली तब्बल १५० शेतकºयांची नावे कमी करून तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्या याद्या तहसील कार्यालयाला सादर केल्या. तहसील कार्यालयाने या याद्या स्वत: तयार न करता पुन्हा कृ.उ.बा.कडे दिल्या. जिल्हाधिकाºयांनी अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त केल्यामुळे तालुक्यात १५० शेतकरी अतिरिक्त ठरले. तरीही तहसील कार्यालयाने याद्या अद्ययावत करण्यासाठी कृ.उ.बा.कडे देण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कृ.उ.बा.ने दोन दिवस या याद्या हाताळल्या. त्यामुळे पुन्हा संशय व्यक्त करण्यात येत आहे.महिनाभरात केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी, ५० हजार क्विंटल कधी मोजणार?दरम्यान , जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ३ मे पासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. मात्र कधी जागेची अडचण, कधी मशनरी नादुरुस्त, तर कधी शेतकºयांशी वाद यामुळे २५ दिवसांमध्ये पाच ते सहा दिवस कापूस खरेदी बंद होती. त्यात ईद व रविवारच्या सुट्ट्या वेगळ्याच. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस खरेदी केंद्र १५ जून पासून बंद होणार असल्याचे वृत्त आहे. सुरू राहिले तरी १५ दिवसानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये तालुक्यातील २५ गावातील ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस व खरेदी केंद्रावर यावल तालुक्यातील २५ व जामनेर तालुक्यातील २४ अशा दोन तालुक्यातील किमान ५० गावातील एक हजार शेतकºयांचा ४० हजार क्विंटल कापूस असू शकतो.अवघ्या पंधरा दिवसात ते हे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याद्या कृ.उ.बा.कडूनतहसीलदार दीपक देवरे यांच्याशी संपर्क केला असता मोबाईलवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कृ.उ.बा. समितीमध्ये शेतकºयांच्या याद्यांचा डाटा असल्यामुळे त्यांच्याकडून याद्या तयार करून घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मात्र या याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा तहसील कार्यालयातून करण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ