शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 15:46 IST

कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे.

ठळक मुद्देव्यापाºयांचा हिरमोडअवघ्या १५ दिवसात सुमारे ४० हजार क्विंटल कापूस खरेदीचे आव्हान

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे. जामनेर व यावल येथील पन्नास गावांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. मात्र त्या गावातील किती शेतकरी व किती क्विंटल कापूस यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे किमान ४० हजार क्विंटल कापूस मोजण्याचे आव्हान सीसीआय कापूस खरेदी केंद्रला आहे.२३ मे रोजी दिले पंचनाम्याचे आदेशकापूस विक्रीसाठी सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी झाली. २२ मे पर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३९१ कापूस उत्पादक शेतकºयांच्या घरात कापूस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद झालेल्या याद्यांवरून दिसून आले. यातील केवळ चार हजार ८९३ शेतकºयांचा कापूस विक्री झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ४३ हजार ४९८ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस घरात पडून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या लक्षात आले. शेतकºयांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे व कसा? याचा अंदाज बांधता यावा यासाठी २३ मे रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांना तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. पंचनामा केल्यानंतर त्या याद्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे द्याव्या. सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना याद्या देऊन कापूस खरेदीच्या सूचना कराव्या, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.तहसील कार्यालचा पुन्हा बाजार समितीवरच विश्वासतालुक्यात कृ.उ.बा. समितीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना दिलेल्या २५ गावातील ७२९ शेतकºयांच्या याद्यांचे पंचनामे अवघ्या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले व ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यानंंतर दिसून आले. याद्यांमध्ये व्यापाºयांंनी त्यांच्या सोयीसाठी टाकलेली तब्बल १५० शेतकºयांची नावे कमी करून तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्या याद्या तहसील कार्यालयाला सादर केल्या. तहसील कार्यालयाने या याद्या स्वत: तयार न करता पुन्हा कृ.उ.बा.कडे दिल्या. जिल्हाधिकाºयांनी अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त केल्यामुळे तालुक्यात १५० शेतकरी अतिरिक्त ठरले. तरीही तहसील कार्यालयाने याद्या अद्ययावत करण्यासाठी कृ.उ.बा.कडे देण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कृ.उ.बा.ने दोन दिवस या याद्या हाताळल्या. त्यामुळे पुन्हा संशय व्यक्त करण्यात येत आहे.महिनाभरात केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी, ५० हजार क्विंटल कधी मोजणार?दरम्यान , जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ३ मे पासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. मात्र कधी जागेची अडचण, कधी मशनरी नादुरुस्त, तर कधी शेतकºयांशी वाद यामुळे २५ दिवसांमध्ये पाच ते सहा दिवस कापूस खरेदी बंद होती. त्यात ईद व रविवारच्या सुट्ट्या वेगळ्याच. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस खरेदी केंद्र १५ जून पासून बंद होणार असल्याचे वृत्त आहे. सुरू राहिले तरी १५ दिवसानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये तालुक्यातील २५ गावातील ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस व खरेदी केंद्रावर यावल तालुक्यातील २५ व जामनेर तालुक्यातील २४ अशा दोन तालुक्यातील किमान ५० गावातील एक हजार शेतकºयांचा ४० हजार क्विंटल कापूस असू शकतो.अवघ्या पंधरा दिवसात ते हे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याद्या कृ.उ.बा.कडूनतहसीलदार दीपक देवरे यांच्याशी संपर्क केला असता मोबाईलवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कृ.उ.बा. समितीमध्ये शेतकºयांच्या याद्यांचा डाटा असल्यामुळे त्यांच्याकडून याद्या तयार करून घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मात्र या याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा तहसील कार्यालयातून करण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ