शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

जिल्हाधिकाऱ्यांचे टंचाई निधी वितरणाचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:26 IST

केवळ उपाययोजनांना देणार मंजुरी

ठळक मुद्दे विभागीय आयुक्तांकडून थेट मिळणार निधी

जळगाव : टंचाई काळात राबविण्यात येणाºया विविध पाणी योजनांसह विहिरी अधिग्रहण, खोलीकरण आदी उपाययोजनांना केवळ मंजुरी देण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाºयांकडे ठेवले असून त्याचा निधी वितरणाचे अधिकार मात्र विलंब होण्याचे कारण देत काढून घेतले आहेत. विभागीय आयुक्तांकडून थेट संबंधीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकाºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे.दरवर्षीच राज्यात अनेक भागात टंचाई परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्या-त्या जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणाखाली टंचाई आराखडा मंजूर करून त्यानुसार उपाययोजना राबविल्या जातात. त्यासाठी शासनाकडून निधी मागविला जातो. तो टंचाई निधी या हेडखाली खर्च केला जातो. मागील वर्षी म्हणजेच २०१७-१८ या आर्थिक वर्षात टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासल्लाी १४.१८ कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी ११.२२ कोटी रूपये खर्च करण्यात आले. उर्वरीत निधी यंदा शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत खर्च करण्यात येत आहे. तसेच यंदा म्हणजेच २०१८-१९ या वर्षासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपये अनुदान आव्श्यक आहे. त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तर जिल्ह्णाचा १००३ गावांसाठी १६२० उपाययोजना प्रस्तावित असलेला ३६.२४ कोटी रूपयांचा टंचाई आराखडाही करण्यात आला आहे. त्यासाठी गरजेनुसार निधीची मागणी केली जाणार आहे.निधी वितरण पद्धतीत अचानक बदलदरवर्षी जि.प. व न.पां. कडून जिल्हाधिकाºयांकडे टंचाई योजना मंज़ुरीसाठी प्रस्ताव येत, त्यांना जिल्हाधिकाºयांकडून मंजूरी दिली जात असे. तसेच काम पूर्ण झाल्यावर त्याच्या निधीचे वितरणही जिल्हाधिकाºयांकडून केले जात आहे. सहा महिन्यांनी हा निधी प्राप्त होत होता. असे असताना निधी वितरणात होणारा विलंब टाळण्याचे कारण देत जिल्हाधिकाºयांचे निधी वितरणाचे अधिकार काढून घेण्यात आले असून आता विभागीय आयुक्तांकडून थेट जि.प. व नपा मुख्याधिकाºयांना निधी वितरीत होणार आहे. जानेवारी २०१९ पासूनच हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शासनाकडून विभागीय आयुक्तांकडे, विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाºयांकडे व त्यांच्याकडून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे व त्यांच्याकडून गटविकास अधिकाºयांकडे निधीचे वितरण होणाºया साखळीतील एक कडी कमी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामदास गोयल यांनी हा निर्णय घेतला आहे.छाननी व आढावा मात्र जिल्हाधिकाºयांकडेचवेळ जात असल्याचे कारण देत जिल्हाधिकाºयांचे टंचाई निधी वितरणाच्ंो अधिकार काढून घेणाºया शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई योजनांच्या प्रस्तावांची छाननी करून मंजुरी देणे, तसेच टंचाई उपाययोजनांचा आढावा घेण्याची जबाबदारी मात्र जिल्हाधिकाºयांवरच कायम ठेवली आहे. जर वेळेची बचतच करायची होती, तर याच सर्वाधिक वेळखाऊ प्रक्रियेतही बदल करून सुटसुटीतपणा आणणे अपेक्षित होते. त्यामुळे सहा महिन्यांनी मिळणाºया निधी वितरणाचेच अधिकार जिल्हाधिकाºयांकडून काढून घेऊन नेमके काय साध्य केले? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी