शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जिल्हाधिकाऱ्यांचे टंचाई निधी वितरणाचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:26 IST

केवळ उपाययोजनांना देणार मंजुरी

ठळक मुद्दे विभागीय आयुक्तांकडून थेट मिळणार निधी

जळगाव : टंचाई काळात राबविण्यात येणाºया विविध पाणी योजनांसह विहिरी अधिग्रहण, खोलीकरण आदी उपाययोजनांना केवळ मंजुरी देण्याचे अधिकार शासनाने जिल्हाधिकाºयांकडे ठेवले असून त्याचा निधी वितरणाचे अधिकार मात्र विलंब होण्याचे कारण देत काढून घेतले आहेत. विभागीय आयुक्तांकडून थेट संबंधीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकाºयांना निधीचे वितरण केले जाणार आहे.दरवर्षीच राज्यात अनेक भागात टंचाई परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्या-त्या जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणाखाली टंचाई आराखडा मंजूर करून त्यानुसार उपाययोजना राबविल्या जातात. त्यासाठी शासनाकडून निधी मागविला जातो. तो टंचाई निधी या हेडखाली खर्च केला जातो. मागील वर्षी म्हणजेच २०१७-१८ या आर्थिक वर्षात टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासल्लाी १४.१८ कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी ११.२२ कोटी रूपये खर्च करण्यात आले. उर्वरीत निधी यंदा शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत खर्च करण्यात येत आहे. तसेच यंदा म्हणजेच २०१८-१९ या वर्षासाठी मार्च २०१९ अखेरपर्यंत पाणीटंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता ११.८५ कोटी रूपये अनुदान आव्श्यक आहे. त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तर जिल्ह्णाचा १००३ गावांसाठी १६२० उपाययोजना प्रस्तावित असलेला ३६.२४ कोटी रूपयांचा टंचाई आराखडाही करण्यात आला आहे. त्यासाठी गरजेनुसार निधीची मागणी केली जाणार आहे.निधी वितरण पद्धतीत अचानक बदलदरवर्षी जि.प. व न.पां. कडून जिल्हाधिकाºयांकडे टंचाई योजना मंज़ुरीसाठी प्रस्ताव येत, त्यांना जिल्हाधिकाºयांकडून मंजूरी दिली जात असे. तसेच काम पूर्ण झाल्यावर त्याच्या निधीचे वितरणही जिल्हाधिकाºयांकडून केले जात आहे. सहा महिन्यांनी हा निधी प्राप्त होत होता. असे असताना निधी वितरणात होणारा विलंब टाळण्याचे कारण देत जिल्हाधिकाºयांचे निधी वितरणाचे अधिकार काढून घेण्यात आले असून आता विभागीय आयुक्तांकडून थेट जि.प. व नपा मुख्याधिकाºयांना निधी वितरीत होणार आहे. जानेवारी २०१९ पासूनच हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शासनाकडून विभागीय आयुक्तांकडे, विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाºयांकडे व त्यांच्याकडून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे व त्यांच्याकडून गटविकास अधिकाºयांकडे निधीचे वितरण होणाºया साखळीतील एक कडी कमी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामदास गोयल यांनी हा निर्णय घेतला आहे.छाननी व आढावा मात्र जिल्हाधिकाºयांकडेचवेळ जात असल्याचे कारण देत जिल्हाधिकाºयांचे टंचाई निधी वितरणाच्ंो अधिकार काढून घेणाºया शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई योजनांच्या प्रस्तावांची छाननी करून मंजुरी देणे, तसेच टंचाई उपाययोजनांचा आढावा घेण्याची जबाबदारी मात्र जिल्हाधिकाºयांवरच कायम ठेवली आहे. जर वेळेची बचतच करायची होती, तर याच सर्वाधिक वेळखाऊ प्रक्रियेतही बदल करून सुटसुटीतपणा आणणे अपेक्षित होते. त्यामुळे सहा महिन्यांनी मिळणाºया निधी वितरणाचेच अधिकार जिल्हाधिकाºयांकडून काढून घेऊन नेमके काय साध्य केले? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी