शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

रब्बी पीक कर्ज वाटपात जिल्हा बँक पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपात यंदा बँकांनी चांगलाच हात आखडता घेतला आहे. त्यात जिल्हा बँकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपात यंदा बँकांनी चांगलाच हात आखडता घेतला आहे. त्यात जिल्हा बँकेने आपल्या उद्दिष्टाच्या फक्त १.६० टक्केच कर्जवाटप केले आहे. यंदा बँकेने ८५४ सभासदांना फक्त २ कोटी ७० लाख रुपये कर्ज दिले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांनीही पीक कर्जासाठी हात आखडताच घेतला आहे.

जिल्हा बँकेला रब्बीसाठी १६९ कोटी १२ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र बँकेने फक्त २ कोटी ७० लाखांचेच कर्ज दिले आहे, तर राष्ट्रीयीकृत बँकांना ४४३ कोटींचे लक्ष्य होते. मात्र कुणाचाही धाक नसलेल्या या बँकांनी कागदपत्रांमध्ये शेतकऱ्यांची फिरवाफिरव केली आणि फक्त ८३ कोटी ३३ लाखांच्या कर्जाचे वाटप केले. त्यात जिल्हाभरातून कर्जदार फक्त १००६ आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्ष्याच्या फक्त १८.७७ टक्केच कर्ज दिले आहे.

याबाबतीत ग्रामीण बँका मात्र पुढे आहेत. त्यांनी ६५ टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण केले. यामुळे बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना हातउसने पैसे घेऊन रब्बी पिकांचा खर्च करावा लागला आहे. मुळात रब्बी पिकांसाठी बहुतेक शेतकरी खरीप हंगामात आलेला पैसाच वापरतात. त्यामुळे रब्बी हंगामासाठी उद्दिष्ट हे खरीप हंगामापेक्षा कमी असते. असे असले तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कायमच पैशांची चणचण भासते. त्यातच यंदा कोरोनाने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांना वेळेवर अर्थपुरवठा करण्याची गरज होती. मात्र बँकांनी तेथेही हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणवली जाणारी जिल्हा सहकारी बँकनेदेखील सावध पवित्रा घेतला आहे.

आकडेवारी

रब्बी पीक कर्जाची स्थिती

बँकेचे नाव- वाटप केलेले कर्ज- टक्केवारी

जिल्हा बँक- २ कोटी ७० लाख- टक्केवारी १.६० टक्के

राष्ट्रीयीकृत बँका- ८३ कोटी ३३ लाख- टक्केवारी १८.७७ टक्के

ग्रामीण बँका- २ कोटी ७७ लाख- टक्केवारी----