शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जुन्या ठरावांप्रमाणेच होणार जिल्हा बँकेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बँकेच्या मे २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्यावर्षी जिल्ह्यातील ५३३ विकास सोसायट्या व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेच्या मे २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्यावर्षी जिल्ह्यातील ५३३ विकास सोसायट्या व इतर संस्थाचे ७८१ असे एकूण १ हजार ३१४ संस्थाचे ठराव करण्यात आले होते. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक ही कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्याने, हे ठराव रद्द होतील, अशी शक्यता होती. मात्र, आता जिल्हा बँकेची निवडणूक ही जुन्या ठरावाप्रमाणेच होणार असल्याची माहिती पुणे येथील मुख्य संचालक यशवंत गिरी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत ही मे २०२० मध्ये संपली होती. मात्र, या निवडणुकीसाठी ठराव देखील करण्यात आले होती. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यातच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध संस्थांनी केलेल्या या ठरावधारकांना मतदान करता येणार होते. मात्र, ठराव झाल्यानंतर ६ महिन्यांचा आत निवडणूक न झाल्यास हे ठराव रद्द होत असतात. आता जिल्हा बँकेचे ठराव होऊन वर्षभराचा कार्यकाळ झाल्याने जिल्हा बँकेने केलेले ते सर्व ठराव रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया ज्या ठिकाणापासून थांबली होती. त्याच ठिकाणापासून पुढे सुरू होणार आहे. यामुळे जुन्या ठरावांप्रमाणेच निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती यशवंत गिरी यांनी दिली.

याचिकाही फेटाळली

मतदार याद्या अद्ययावत करूनच जिल्हा बँकेची निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. यासह २०२० मध्ये होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या, त्याच टप्प्यावरून ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ठरावासाठी ज्या नेतेमंडळींनी पैसा खर्च केला होता; त्यांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.

काही सोसायट्यांचे बदलू शकतात ठराव

जिल्हा बँकेचे अनुभवी संचालक गुलाबराव देवकर यांनी याबाबत सांगितले की, ज्या विकास सोसायट्यांच्या निवडणुका होणार नाहीत त्या सोसायट्यांचे ठराव कायम राहणार आहेत. तर ज्या सोसायट्यांचा निवडणुका आता होणार आहेत. त्या सोसायट्या आपला ठराव बदलू शकतात, अशी माहिती देवकर यांनी दिली. जिल्हा बँकेच्या २०१५ च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली. त्यामुळे मे २०२० मध्ये ही निवडणूक होणे अपेक्षित होते. यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील विकास सोसायट्यांकडून ठराव करून घेण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यातच ही प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे निवडणूक जवळ असल्याने इच्छुकांकडून ठरावधारकांवर चांगलाच पैसा खर्च करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी तर ठरावधारकांना मतदानासाठीची रक्कमदेखील देण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यामुळे ठरावधारकांवर खर्च करण्यात आलेला खर्च वाया जाण्याची भीती इच्छुकांना वाटत होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ठरावांसाठी पैसा खर्च करणाऱ्यांचा जीव भांड्यात आला आहे.