शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

मका खरेदीसाठी जिल्ह्याला ६० हजार क्विंटलचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रब्बी हंगाम संपून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असताना देखील अद्यापही रब्बी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रब्बी हंगाम संपून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असताना देखील अद्यापही रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही. त्यात राज्य शासनाने मका खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले असून, जळगाव जिल्ह्याला मका खरेदीसाठी ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

राज्यासाठी एकूण ३ लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जळगाव जिल्ह्याला देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असला, तरी खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत मात्र राज्य शासनाने अजूनही कोणतेही आदेश काढलेले नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेल्या आहेत. गेल्यावर्षी देखील जळगाव जिल्ह्याला ४० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० हजार क्विंटलने उद्दिष्ट वाढले असले तरी मका उत्पादक शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर माल विक्रीसाठी झालेली नोंदणी मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा न करता आता व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय खरेदी केंद्रांना होणाऱ्या उशिरामुळे शेतकऱ्यांनी आता ही भूमिका घेतली आहे.

मका विक्रीसाठी सहा हजार शेतकऱ्यांची नोंदणी

रब्बी हंगामातील पिकांसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण १६ हमीभाव केंद्रांवर १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ३० एप्रिलपर्यंत ही नोंदणीसाठी मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार मका विक्रीसाठी जिल्ह्यातील ६ हजार ५७४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ज्वारीसाठी सर्वाधिक १० हजार ६७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात कमी नोंदणी ७६ इतकी गव्हासाठी झाली आहे. मका खरेदीसाठी राज्य शासनाने उद्दिष्ट जाहीर केले असले तरी मात्र हमीभाव केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत कोणतीही घोषणा शासनाने केलेली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी देखील आता हमीभाव केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता खरीप हंगामासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

कोट..

उद्दिष्ट जाहीर केले मात्र खरेदी केव्हा करणार

राज्य शासनाने मका खरेदी एप्रिल महिन्यातच सुरू करण्याची गरज होती. मात्र ती खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आपला माल विक्री केला आहे. त्यामुळे आता खरेदी केंद्र सुरू करून देखील शेतकऱ्यांना कोणताही लाभ यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांचा नावावरच व्यापारीच आपला माल याठिकाणी विक्री करतात.

-ॲड. हर्षल चौधरी, शेतकरी