शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मका खरेदीसाठी जिल्ह्याला ६० हजार क्विंटलचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रब्बी हंगाम संपून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असताना देखील अद्यापही रब्बी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रब्बी हंगाम संपून आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असताना देखील अद्यापही रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही. त्यात राज्य शासनाने मका खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले असून, जळगाव जिल्ह्याला मका खरेदीसाठी ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

राज्यासाठी एकूण ३ लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जळगाव जिल्ह्याला देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असला, तरी खरेदी केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत मात्र राज्य शासनाने अजूनही कोणतेही आदेश काढलेले नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेल्या आहेत. गेल्यावर्षी देखील जळगाव जिल्ह्याला ४० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० हजार क्विंटलने उद्दिष्ट वाढले असले तरी मका उत्पादक शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर माल विक्रीसाठी झालेली नोंदणी मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा न करता आता व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय खरेदी केंद्रांना होणाऱ्या उशिरामुळे शेतकऱ्यांनी आता ही भूमिका घेतली आहे.

मका विक्रीसाठी सहा हजार शेतकऱ्यांची नोंदणी

रब्बी हंगामातील पिकांसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण १६ हमीभाव केंद्रांवर १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ३० एप्रिलपर्यंत ही नोंदणीसाठी मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार मका विक्रीसाठी जिल्ह्यातील ६ हजार ५७४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ज्वारीसाठी सर्वाधिक १० हजार ६७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सर्वात कमी नोंदणी ७६ इतकी गव्हासाठी झाली आहे. मका खरेदीसाठी राज्य शासनाने उद्दिष्ट जाहीर केले असले तरी मात्र हमीभाव केंद्र केव्हा सुरू होतील याबाबत कोणतीही घोषणा शासनाने केलेली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी देखील आता हमीभाव केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता खरीप हंगामासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

कोट..

उद्दिष्ट जाहीर केले मात्र खरेदी केव्हा करणार

राज्य शासनाने मका खरेदी एप्रिल महिन्यातच सुरू करण्याची गरज होती. मात्र ती खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आपला माल विक्री केला आहे. त्यामुळे आता खरेदी केंद्र सुरू करून देखील शेतकऱ्यांना कोणताही लाभ यामुळे मिळणार नाही. शेतकऱ्यांचा नावावरच व्यापारीच आपला माल याठिकाणी विक्री करतात.

-ॲड. हर्षल चौधरी, शेतकरी