शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

By admin | Updated: November 6, 2015 00:11 IST

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार : अन्न व औषध प्रशासन विभागाचा ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’

प्रकार सुरूच आहे. दिवाळीत अन्न पदार्थाची गुणवत्ता, भेसळ याबाबत पुन्हा आलबेल चित्र भासवले जात आहे. सणासुदीच्या काळात किमान 15 दिवस आधी या विभागाने मिठाई व इतर पदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन करून त्यांना भेसळीसंदर्भात कडक कारवाईचा इशारा देणे आवश्यक असताना तसे काहीही दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

 

नंदुरबारात आधीच दुधाची टंचाई आहे. असे असताना शहरात असलेल्या 25 पेक्षा अधिक मोठय़ा हॉटेल्सचालकांना मावा बाहेरूनच आयात करावा लागतो. त्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद, सुरत या शहरांना सर्वाधिक पसंती आहे. तयार माव्याची ऑर्डर दिल्यास तो ऑर्डरच्या ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था विक्रेत्यांकडे आहे. आयात केलेल्या माव्यावर प्रक्रिया करून त्याची मिठाई तयार केली जाते.

या माव्यात भेसळ किती हा भाग अलहिदा असतो. भेसळीचे प्रमाण जास्त राहिल्यास त्यातून विषबाधेसारखे प्रकारही घडून येतात. चार वर्षापूर्वी रबडीतून विषबाधा झाली होती. दोन वर्षापूर्वी दिवाळीच्या काळात शेकडो किलो भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने अशा प्रकारची कारवाई कधीही केलेली ऐकीवात नाही.

दिवाळीला मिठाईला मागणी वाढते. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणाहून मावा मागवत असतात. ही बाब लक्षात घेता त्यात त्याची गुणवत्ता पाहिली जात नाही. परिणामी बोगस व भेसळयुक्त माव्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात असल्याचा आरोपही करण्यात येतो.

हॉटेलमधील अस्वच्छता

चार वर्षापूर्वी रबडी विषबाधेनंतर हॉटेल्समधील स्वच्छता, उघडय़ावरील खाद्यपदार्थाची विक्री, खाद्यपदार्थाची गुणवत्ता, भेसळ आदी प्रश्न चर्चेत आले होते. जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने नेहमीप्रमाणे सोपस्कार केले. हॉटेल्स व्यावसायिकांनी एक दिवस सामूहिक स्वच्छता करून उरकवून घेतले. हॉटेल्समधील पदार्थ तयार करणा:या जागेवरील स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर तरी काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

विभागाचे दुर्लक्ष

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हा धुळे येथून चालतो. नंदुरबारला स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार हा उंटावरून शेळ्या हाकलण्याच्या प्रकारासारखाच झाला आहे. त्यामुळे भेसळखोरांचे मोठय़ा प्रमाणावर फावले आहे.

वास्तविक दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. ते पाहता भेसळ होणार नाही, पदार्थाची गुणवत्ता टिकून राहील यासाठी या विभागाच्या अधिका:यांनी मोठय़ा मिठाई विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांचे प्रबोधन करून, त्यांच्या हॉटेल्सला भेट देऊन मार्गदर्शन करणे आवश्यक होते. प्रसंगी भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारादेखील देता आला असता. परंतु त्यातील कुठलाच प्रकार या विभागाच्या अधिका:यांनी केला नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे.