शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावात बालकवी पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 20:12 IST

शशिकांत हिंगोणेकर व दिलीप पाटील यांचा सन्मान

ठळक मुद्देस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी व श्रोत्यांनी स्व. दामूअण्णा दाते सभागृह तुडुंब भरले होते. यानिमित्ताने धरणगाव शहरातील पी. आर. बालकवी, इंदिरा विद्यालय व साकरे विद्यालयातील विद्याथ्र्यांनी कवी किनगावकर यांच्याशी त्यांच्या दहावीच्या मराठी पुस्तकातील ‘वारस’ या कवितेबाबत प्रश्नोत्तर व चर्चेतूून संवाद साधला.

ऑनलाईन लोकमत धरणगाव (जि. जळगाव), दि. 13 : बालकवींच्या जन्मगावी अखंड 25 वर्षे बालकवींची स्मृती जतन करत साहित्य, कला व संस्कृतीचा प्रसार करणा:या साहित्य कला मंचचे कार्य अभिनंदनीय आहे. या संस्थेतर्फे दिल्या जाणा:या बालकवी काव्य पुरस्कारांना महाराष्ट्र स्तरावर लोकमान्यता प्राप्त झाली आहे. पुरस्कारार्थ्ीनी बालकवींचा वारसा जोपासून पुरस्काराचा आनंद जीवनभर हृदयात साठवून ठेवण्यासारखा असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी काढले. बालकवींच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी प्रकाश किनगावकर यांच्या हस्ते प्रसिध्द कवी व लातूर विभागीय मंडळाचे शिक्षण सचिव शशिकांत हिंगोणेकर यांना राज्यस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार, तर तरडी, ता.पारोळा येथील कवी दिलीप पाटील यांना खान्देशस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदिरा कन्या विद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. पाटील, विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन, साहित्य कलामंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथींचा परिचय बी. डी. शिरसाठ व डी. एस. पाटील यांनी करून दिला. मंचच्या उपक्रमांना आर्थिक सहकार्य म्हणून प्रा. सी. एस. पाटील यांनी 1100 रुपये देणगी दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले.